शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राजस्थानातील प्रेमकहाणीचा नगरमध्ये करुण अंत : प्रियकरच ठरला खलनायक

By अरुण वाघमोडे | Updated: July 16, 2019 16:03 IST

तिने त्याच्यावर जिवापाड प्रेम केले. माता-पित्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केले.

अरुण वाघमोडे

अहमदनगर : तिने त्याच्यावर जिवापाड प्रेम केले. माता-पित्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केले. लग्नानंतर मात्र अवघ्या दीड वर्षातच पतीचा द्वेष आणि छळ तिच्या वाट्याला आला. एक महिन्यापूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला. आता तरी संसार सुखाचा होईल, असे स्वप्न ती पाहत असताना पतीने तिचा छळ करत अवघ्या एक महिन्याच्या बाळाचाही जीव घेतला. राजस्थानच्या वाळवंटात उमललेल्या अर्चना कुमावत हिच्या प्रेमकहाणीचा नगरमध्ये करुण अंत झाला.राजस्थानातील फुलोरा (जि. जयपूर) तालुक्यातील पंचमुखी या गावात राहणारा तरुण सोहन पुशाराम कुमावत याची याच गावातील अर्चना (वय २१) हिच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तब्बल चार वर्षे त्यांचे हे प्रेमप्रकरण सुरू होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आंतरजातीय विवाह असल्याने दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. या प्रेमयुगुलांनी घरच्यांच्याविरोधात बंडखोरी करत मध्यप्रदेश येथे पलायन केले. १८ जानेवारी २०१८ रोजी उज्जैन येथे मंदिरात लग्न केले. सोहन हा फरशी बसविण्याचे काम करत होता. लग्नानंतर उपजीविका भागविण्यासाठी अर्चना आणि सोहन नगरमध्ये आले. येथे ते तपोवन रोडवर घर घेऊन राहू लागले. लग्नानंतर मात्र सोहनचे अर्चनावरील पे्रम कमी होऊ लागले. त्याला दारुचे व्यसन लागले. ‘तुझ्यामुळेच मला माझे घर सोडावे लागले. तुझ्यामुळेच माझे नातेवाईक मला घरी येऊ देत नाहीत’ असे म्हणत सोहन अर्चना हिला वारंवार मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. अर्चना त्याला समजावून सांगत होती. मीही तुझ्यामुळे माझ्या आई-वडिलांना सोडून आले. आता आपण सुखाचा संसार करु असे अर्चना त्याला वारंवार सांगत होती. सोहन याने मात्र तिला त्रास देण्याचे थांबविले नाही.महिनाभरापूर्वी अर्चना हिने एका बाळाला जन्म दिला होता. बाळ झाल्यानंतरही तिला सोहन त्रास देतच होता. १० जुलै रोजी याच कारणातून सोहन याने अर्चना हिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या अवघ्या एक महिन्याच्या बाळालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. अर्चना त्याची याचना करत होती. सोहन याने मात्र बाळाला जमिनीवर आपटून त्याचा जीव घेतला. ज्याच्यावर पे्रम केले तोच सोहन अर्चनाच्या आयुष्यात सर्वात मोठा खलनायक ठरला. या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी आरोपी सोहन याला अटक केली आहे.अर्चना हिच्या बाळाच्या मृत्युनंतर पोलिसांनी तिचा पती सोहन याला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. अर्चना हिने सोहनसाठी माता-पित्यांना सोडल्याने ती घरीही जाऊ शकत नाही. पतीच्या कृत्यामुळे अर्चनाचे आयुष्य तरुण वयातच उद्ध्वस्त झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस