शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नगर शहराला भयमुक्ती नाही; भैयामुक्तीची गरज : दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:18 IST

नगर शहराला कुणाचेच भय नाही. शहर ‘भैयामुक्त’ झाले की आपोआप भयमुक्त होईल. या शहराला २५-३० वर्षात गटारींशिवाय काहीच मिळाले नाही.

अहमदनगर : नगर शहराला कुणाचेच भय नाही. शहर ‘भैयामुक्त’ झाले की आपोआप भयमुक्त होईल. या शहराला २५-३० वर्षात गटारींशिवाय काहीच मिळाले नाही. शिवसेनेने या शहरात काहीही विकास कामे न करता उलट विकासात खोडा घातला, अशी टीका खासदार दिलीप गांधी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केली. अनिल राठोड हेच फिक्सर असल्याचा आरोप करत ‘खासदारांनी काहीही कामे केली नाही’, असे म्हणणारे डॉ. सुजय विखे कोण? त्यांचे काय योगदान आहे? असा प्रश्न गांधी यांनी या मुलाखतीत केला.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत फेसबुक पेजवर गांधी यांची सोमवारी लाईव्ह मुलाखत झाली. शिवसेनेच्या ‘भयमुक्ती’च्या नाऱ्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी वरील टीका केली.

व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.

ते म्हणाले, शहरात शिवसेनेसह कोणत्याच पक्षाकडे विकासाचे व्हीजन नाही. नगरसेवकांकडेही दृष्टी व इच्छाशक्ती नाही.महापालिकेत विकासाचे मुद्दे मांडले तर टिंगल-टवाळी केली जाते. या सर्व बाबींचा कंटाळा आल्याने भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरली आहे. गेल्या १५ वर्षात महापालिकेने उत्पन्नाची साधने वाढवली नाहीत. शहरातील एकही चौक आणि कारंजा सुशोभित केला नाही. कंपन्या सुशोभिकरणासाठी तयार असताना हे काम होऊ दिले नाही. पालिकेकडे सक्षम अभियंतेच नाहीत.शिवसेनेमुळेच उड्डाणपूल रखडलाकेंद्र सरकारने जिल्ह्यातील महामार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग केले. त्यामुळे उड्डाणपुलाचाही खर्च केंद्र सरकारच करणार आहे. मात्र महापालिकेत शिवसेनेने उड्डाणपुलासंबंधीच्या मान्यतेचा प्रस्ताव सहा महिने प्रलंबित ठेवला. महापालिकेच्या खर्चाचा वाटा राज्य सरकार देईल, असे सांगूनही सेनेने हे काम अडविले. तत्पूर्वी राष्टÑवादी व बबनराव पाचपुते यांनीही पुलाचा खेळखंडोबा केला.स्वत:च्या व्यवसायासाठी काही लोकांना हा पूलच नको आहे. आपण या पुलासाठी अडीच वर्षांपासून काम करीत असून त्यातील बहुतांशी अडथळे आता दूर झाले आहेत, असे गांधी म्हणाले. ‘पुलाचा व महापालिकेचा काही संबंध नाही, तो खासदारांनी करायला हवा होता’, या सुजय विखे यांच्या टीकेकडे लक्ष वेधले असता गांधी म्हणाले, पुलासाठी जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन कराव्या लागतात. त्यामुळे महापालिकेचा संबंध येतोच. विखे यांचे ज्ञान अर्धवट आहे. नगर-पुणे रेल्वेचाही प्रश्न लवकर सुटणार असून मुंबई-पुणेच्या धर्तीवर भविष्यात ‘नगर-पुणे’ रेल्वेगाडी धावेल, असे गांधी यांनी सांगितले. शहरात ३०० बेडचे रुग्णालय मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली.महापौरपदाचा उमेदवार निकालानंतरचसर्व पक्षांनी महापौर पदाचे उमेदवार जाहीर करावे, या सुजय विखे यांच्या मागणीकडे लक्ष वेधले असता गांधी म्हणाले, ‘थेट जनतेतून निवड असेल तर उमेदवार जाहीर केला जातो. येथे निवडून आलेल्या नगरसेवकांमधून महापौर निवडला जाणार आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याचा प्रश्नच नाही’. प्रत्येक नगरसेवकाची महापौर होण्याची इच्छा असते. त्यामध्ये सुवेंद्र गांधी यांचेही नाव असू शकेल. सुवेंद्र हा जसा मुलगा आहे, तसाच तो एक नगरसेवकही असेल. त्यामुळे त्यांनाही महापौर होण्याचा अधिकार आहे, असे गांधी म्हणाले. पंतप्रधानपदाचा विषय हा देशाचा असल्याने तिथे आधी उमेदवार जाहीर झाला होता, असेही त्यांनी सांगितले.राठोड सर्वात मोठे फिक्सरया निवडणुकीत भाजप व दोन्ही कॉंग्रेसचे फिक्सिंग आहे, असा आरोप राठोड यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केला होता. याबाबत गांधी म्हणाले, २००८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ३३ जणांची गटनोंदणी केली असताना त्यांचे नगरसेवक राष्ट्रवादीला मिळाले. राठोड यांनीच त्यांना राष्ट्रवादीत पाठविले. राठोड यांच्या पाठिंब्यामुळेच अरुण जगताप नगराध्यक्ष झाले होते. राठोड यांनी गांधी मैदानात जगताप यांचे कौतुक केलेले आहे. आम्ही नव्हे राठोड हे सर्वात मोठे राजकीय फिक्सर आहेत.

मोदी-कोतकर यांचे फोटो अयोग्यच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे केडगावात सोबत झळकत आहेत, याकडे लक्ष वेधले असता हे चुकीचे असून हे फोटो काढण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. 

व्हिडिओ पाहण्यासाठी ` Lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका