शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : भाजपच्या इच्छुकांची यादी मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:19 IST

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. मंगळवारी प्रभाग १३ ते १७ या पाच प्रभागासाठीच्या मुलाखती झाल्या. दुसऱ्या दिवशीही वाजत-गाजत आणि मोटारसायकल रॅली काढून इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. मुलाखती दिलेल्या इच्छुकांची यादी घेऊन प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले आहेत.भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, कोअर कमिटीचे सदस्य तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, प्रा. भानुदास बेरड, किशोर बोरा, सुनील रामदासी यांनी या मुलाखती घेतल्या. दुसºया दिवशी उर्वरित पाच प्रभागांसाठी ९० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ ते ८ प्रभागांसाठी ११७ जणांनी मुलाखती दिल्या होत्या. त्याच दिवशी सायंकाळ ते रात्री उशिरापर्यंत ९ ते १२ प्रभागासाठी ६० जणांनी मुलाखती दिल्या.दुसºया दिवशी प्रभाग १३ ते १७ साठी ९० जणांनी मुलाखती दिल्या. अशा एकूण २६७ जणांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती खा. दिलीप गांधी यांनी सांगितली.मंगळवारी दुपारीच मुलाखत प्रक्रिया संपली. त्यानंतर कोअर कमिटीने अर्जांची छाननी केली. इच्छुकांची चाळणी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची यादी घेऊन प्रदेश सरचिटणीस ठाकूर मुंबईला रवाना झाले.मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजपाकडून या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.सर्वे हा सर्वेसर्वा नाहीसर्वे हा सर्वेसर्वा नाही. ती एक मार्गदर्शन करणारी प्रक्रिया आहे. सर्वे, सोशल इंजिनिअरिंग, कोअर कमिटीचा निर्णय यातून उमेदवार निवडले जाणार आहेत. आता युती-बिती काही होणार नाही. युतीचा विषय संपला आहे. शिवसेनेने केलेली चर्चा ही व्यक्तिगत पातळीवर होती, ती पक्षस्तरावर नव्हती. त्यामुळे त्या चर्चेला अर्थ नाही, असे शहर जिल्हाध्यक्ष तथा खा. दिलीप गांधी यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, भाजपात प्रभाग क्रमांक १५ मध्ये सोळा इच्छुक बरोबर फिरले. त्यापैकी चार जणांना उमेदवारी द्या, अन्य त्यांचा प्रचार करणार आहेत. असे फक्त भाजपातच होऊ शकते. विकास झाला पाहिजे, हीच सर्व इच्छुकांची भावना होती, असे खा. गांधी म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा