शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नगर मनपा निवडणूक २०१८ : भाजपच्या इच्छुकांची यादी मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:19 IST

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे दोन दिवसात तब्बल २६७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. मंगळवारी प्रभाग १३ ते १७ या पाच प्रभागासाठीच्या मुलाखती झाल्या. दुसऱ्या दिवशीही वाजत-गाजत आणि मोटारसायकल रॅली काढून इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन केले. मुलाखती दिलेल्या इच्छुकांची यादी घेऊन प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले आहेत.भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी, कोअर कमिटीचे सदस्य तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, प्रा. भानुदास बेरड, किशोर बोरा, सुनील रामदासी यांनी या मुलाखती घेतल्या. दुसºया दिवशी उर्वरित पाच प्रभागांसाठी ९० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ ते ८ प्रभागांसाठी ११७ जणांनी मुलाखती दिल्या होत्या. त्याच दिवशी सायंकाळ ते रात्री उशिरापर्यंत ९ ते १२ प्रभागासाठी ६० जणांनी मुलाखती दिल्या.दुसºया दिवशी प्रभाग १३ ते १७ साठी ९० जणांनी मुलाखती दिल्या. अशा एकूण २६७ जणांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती खा. दिलीप गांधी यांनी सांगितली.मंगळवारी दुपारीच मुलाखत प्रक्रिया संपली. त्यानंतर कोअर कमिटीने अर्जांची छाननी केली. इच्छुकांची चाळणी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची यादी घेऊन प्रदेश सरचिटणीस ठाकूर मुंबईला रवाना झाले.मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजपाकडून या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.सर्वे हा सर्वेसर्वा नाहीसर्वे हा सर्वेसर्वा नाही. ती एक मार्गदर्शन करणारी प्रक्रिया आहे. सर्वे, सोशल इंजिनिअरिंग, कोअर कमिटीचा निर्णय यातून उमेदवार निवडले जाणार आहेत. आता युती-बिती काही होणार नाही. युतीचा विषय संपला आहे. शिवसेनेने केलेली चर्चा ही व्यक्तिगत पातळीवर होती, ती पक्षस्तरावर नव्हती. त्यामुळे त्या चर्चेला अर्थ नाही, असे शहर जिल्हाध्यक्ष तथा खा. दिलीप गांधी यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले, भाजपात प्रभाग क्रमांक १५ मध्ये सोळा इच्छुक बरोबर फिरले. त्यापैकी चार जणांना उमेदवारी द्या, अन्य त्यांचा प्रचार करणार आहेत. असे फक्त भाजपातच होऊ शकते. विकास झाला पाहिजे, हीच सर्व इच्छुकांची भावना होती, असे खा. गांधी म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा