शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

दुष्काळातही नगर शहरात बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:53 IST

तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़ घरासमोरील झाडांना लगडलेले आंबे सध्या लक्ष वेधून घेत आहेत़ यंदा निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ आहे़ लवकर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे़ नगरकरांनी घरासमोर लावलेली आंब्याची झाडे दुष्काळातही मुलांसारखी वाढविल्याने त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे़ हलक्या प्रतिच्या आणि मुरमाड जमिनीत आंब्याची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात़ साधारण पाच ते सहा वर्षांत या झाडांना फळे येतात़ शहरातील बहुतांश परिसरातील जमीन ही हलक्या प्रतिची आहे़ त्यामुळे सारसनगर, केडगाव, बुरुडगाव रोड, सावेडी परिसर, बोल्हेगाव, नागापूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे दिसतात़ घरोघरी एक किंवा दोन आंब्याची झाडे आहेत़ विशेष म्हणजे यंदा वादळाचा फटका न बसल्याने बहरलेल्या आंब्याची गळती झाली नाही़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.हापूस, केशर, कलमी, गावरान आंब्याची झाडेनगरमध्ये घरासमोर इतर फळझाडांसह हापूस, केशर, कलमी व गावरान आंब्याची झाडे दिसतात़ गावरान आंब्याचे झाड मोठ्या प्रमाणात वाढते त्याचे फळ आकाराने लहान व खाण्यास गोड असते़ नगरकरांच्या या वृक्षप्रेमामुळे शहरातील अनेक परिसर हिरवाईने नटलेले दिसतात़नगर शहर परिसरात तसे पावसाचे प्रमाण कमी असते़ मात्र घरगुती वापराच्या पाण्यावर आंब्याची झाडे चांगली येतात़ या झाडांना अपेक्षित जमीन असल्याने झाडांची वाढ लवकर होऊन रोगाचाही प्रादुर्भाव होत नाही़ त्यामुळे नगरमध्ये बहुतांश ठिकाणी घरासमोर मोठमोठी आंब्याची झाडे निदर्शनास येतात़ -पंडित लोणारे, कृषीतज्ज्ञ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर