शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

दुष्काळातही नगर शहरात बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:53 IST

तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़ घरासमोरील झाडांना लगडलेले आंबे सध्या लक्ष वेधून घेत आहेत़ यंदा निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ आहे़ लवकर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे़ नगरकरांनी घरासमोर लावलेली आंब्याची झाडे दुष्काळातही मुलांसारखी वाढविल्याने त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे़ हलक्या प्रतिच्या आणि मुरमाड जमिनीत आंब्याची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात़ साधारण पाच ते सहा वर्षांत या झाडांना फळे येतात़ शहरातील बहुतांश परिसरातील जमीन ही हलक्या प्रतिची आहे़ त्यामुळे सारसनगर, केडगाव, बुरुडगाव रोड, सावेडी परिसर, बोल्हेगाव, नागापूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे दिसतात़ घरोघरी एक किंवा दोन आंब्याची झाडे आहेत़ विशेष म्हणजे यंदा वादळाचा फटका न बसल्याने बहरलेल्या आंब्याची गळती झाली नाही़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.हापूस, केशर, कलमी, गावरान आंब्याची झाडेनगरमध्ये घरासमोर इतर फळझाडांसह हापूस, केशर, कलमी व गावरान आंब्याची झाडे दिसतात़ गावरान आंब्याचे झाड मोठ्या प्रमाणात वाढते त्याचे फळ आकाराने लहान व खाण्यास गोड असते़ नगरकरांच्या या वृक्षप्रेमामुळे शहरातील अनेक परिसर हिरवाईने नटलेले दिसतात़नगर शहर परिसरात तसे पावसाचे प्रमाण कमी असते़ मात्र घरगुती वापराच्या पाण्यावर आंब्याची झाडे चांगली येतात़ या झाडांना अपेक्षित जमीन असल्याने झाडांची वाढ लवकर होऊन रोगाचाही प्रादुर्भाव होत नाही़ त्यामुळे नगरमध्ये बहुतांश ठिकाणी घरासमोर मोठमोठी आंब्याची झाडे निदर्शनास येतात़ -पंडित लोणारे, कृषीतज्ज्ञ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर