शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नगर जिल्ह्यात पन्नास लाख लोकसंख्येसाठी अवघे सव्वातीन हजार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:47 IST

तब्बल ५० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सद्यस्थितीला अवघे ३ हजार २४० इतके पोलीसबळ आहे. अपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नगर जिल्ह्यातील कायदा आणि  सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

अरुण वाघमोडे । अहमदनगर : क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्याची २०११ च्या जणगणनेनुसार ४५ लाख ४३ हजार १६९ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या पाच ते सहा लाखांनी वाढल्याचा अंदाज आहे. म्हणजेच तब्बल ५० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सद्यस्थितीला अवघे ३ हजार २४० इतके पोलीसबळ आहे. अपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि  सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.पोलीस प्रशासनाच्यावतीने सध्या रेझींग डे सप्ताह (महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन) साजरा केला जात आहे. २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात पोलीस दलात गरजेनुसार आवश्यक ते बदल करण्यात आले. नगर जिल्ह्यात मात्र अपवाद वगळता गरजेप्रमाणे पोलीस दल सक्षम करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सध्याची लोकसंख्या आणि पोलिसांच्या संख्येची तुलना केली तर १५५० लोकसंख्येमागे अवघा एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. जागतिक स्तरावर साधारणत: २०० लोकांमागे एक पोलीस असावा असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात ३०० ते ३५० लोकांमागे एक पोलीस कार्यरत असणे असे प्रमाण आहे. नगर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्याच्या तुलनेत नगरमध्ये गुन्हेगारींचे प्रमाण दोन ते तीनपट अधिक आहे. या जिल्ह्यात मात्र नगरच्या तुलनेत पोलीस आणि पोलीस ठाण्यांचीही संख्या जास्त आहे. पोलीस स्टेशनचे प्रस्ताव प्रलंबित जिल्ह्यात सध्या सायबर पोलीस स्टेशन धरून ३१ पोलीस ठाणे आहेत.  तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व ईशू सिंधू यांनी जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस ठाणे व्हावेत यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यावर मात्र अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.    आयुक्तालयासाठी पाठपुरावा नाही जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेत नगरमध्ये पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव नऊ वर्षांपूर्वी गृहविभागाला सादर करण्यात आलेला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या बदलीनंतर याचा सर्वांना विसर पडला. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरूनही आयुक्तालयासाठी पाठपुरावा झालेला दिसत नाही़.गुन्ह्यांचे तपास रखडले अपुºया पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, निवडणुका, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, धार्मिक स्थळांच्या जत्रा-यात्रा हे सर्व संभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी निभावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून जिल्ह्यातील अनेक महत्त्वांच्या गुन्ह्यांचा तपास रखडल्याचे दिसत आहे.

 जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत येथे मनुष्यबळाची कमतरता आहे़ जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस स्टेशन व्हावेत तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ सध्या उपलब्ध आहे ते मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या माध्यमातून कामाचे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसForceफोर्स