शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वाळूंज बाह्यवळण रस्त्यासाठी नागरिकांचा रास्तारोको; १५ दिवसात काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:20 IST

वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.

निंबळक : वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. १५ दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू होईल. त्यावर दररोज पाणी मारले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.नगर-सोलापूर महामार्गावरील वांळुज (ता.नगर) ते नगर-मनमाड बाह्यवळण रस्ता आहे. विळदपासून वांळुजच्या शिवारापर्यत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र वांळुज येथील बाह्यवळण रस्त्यालगत असणा-या वस्तीजवळ हे काम येऊन थांबले. ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे हा रस्ता रखडला आहे. दीड किलोमीटरच्या रखडलेल्या रस्त्यालगत नागरिकांची घरे, शेती आहे. या रस्त्यावरील धुळीमुळे शेतक-यांच्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धुळीमुळे आजाराचे प्रमाण वाढलेले. हा रस्ता तत्काळ दुरुस्ती करावा, याबाबतचे निवेदन महादेव शेळमकर व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे वांळुज येथील ग्रामस्थांनी सोलापूर महामार्गावरशुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता आंदोलन केले.  यावेळी महिलांनी मालवाहतूक गाडया अडवल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना घेराव घालून हा रस्ता तातडीने मार्गा लावण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सरपंच लताबाई महादेव शेळमकर, संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर, राजेंद्र  कडिले, सुखदेव दरेकर, संदीप मोरे, कुंदन शिंदे, अनिल मोरे, बाजीराव दरेकर, विजय शेळमकर, रावसाहेब शिंदे, सोमनाथ जाधव, नवनाथ हिंगे ,भरत दरेकर, वैभव सपाटे, लंकाबाई दरेकर, शोभा दरेकर, शंकुतला हिंगे ,सरस्वती दरेकर, अलका शिंदे, चंदाबाई जाधव, महंमद पठाण, बाळासाहेब कोल्हे, मोहन दरेकर, आकाश जाधव, संतोष गायकवाड, विजय हिंगे, कुंडलिक दरेकर उपास्थित होते.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा