शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोपरगावात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 15:36 IST

शहरातील चार दिवसांच्या १०० टक्के लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बुधवारी नागरिकांची चांगलीच झुंबड पडली होती.

कोपरगाव : शहरातील चार दिवसांच्या १०० टक्के लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बुधवारी नागरिकांची चांगलीच झुंबड पडली होती.

      शहरात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने प्रशासनाने १०० टक्के लॉकडाऊन लागू केले होते. प्रशासनाने वैद्यकीय सेवा व पाणी  वगळता सर्व सेवा बंद करून १४ एप्रिलपर्यंत कोपरगाव शहर १०० टक्के लॉकडाऊन केले होते.  कोपरगाव नगरपरिषदेने चार दिवसांच्या १०० टक्के लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू संदर्भात वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसारच नागरिकांनी घराबाहेर पडायचे आहे. किराणा दुकान, भाजीपाला विक्री, फळविक्री, चिकन, मटन, मासे विक्री यांच्यासाठी बुधवार, शुक्रवार, रविवार हे वार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत निश्चित केले आहेत. पिठाची गिरणी दररोज ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार आहे.

    शुक्रवारी प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीने केलेल्या चार दिवसाच्या १०० टक्के लॉकडाऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळाव करून ओढाताण करावी लागली. त्यामुळे या बंदनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवार हा पहिलाच वार आल्याने शहरातील नागरिकांनी या वस्तू खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. शहरातील लक्ष्मीनगर, साईनगर हा परिसर २३ एप्रिलपर्यंत सील राहणार आहे. मात्र तेथील नागरिकाना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी भाजीपाला, किराणा तसेच वैद्यकीय सुविधा या तीन वारानुसार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव