शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा शाळेतच २४ जून पासून प्रवेश सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:59 IST

अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा शाळास्तरावर राबवली जाणार असून कागदपत्रांची पडताळणी देखील शाळास्तरावरच केली जाणार आहे. २४ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा शाळास्तरावर राबवली जाणार असून कागदपत्रांची पडताळणी देखील शाळास्तरावरच केली जाणार आहे. २४ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यात राज्यात १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना संदेश पाठवण्यात आले आहेत. दरम्यान आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस शासनाने परवानगी दिली आहे. दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून होत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ही प्रक्रिया यंदापुरती शाळास्तरावर होणार आहे. म्हणजे कागदपत्रांची सर्व पडताळणी शाळास्तरावरच होईल व अंतिम मान्यता तालुका पडताळणी समिती देईल. 

शाळांनी प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर लावून निवड झालेल्या मुलांच्या पालकांना संदेश पाठवून प्रवेशासाठी बोलवायचे आहे. गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे आॅनलाईन नोंद करावी, तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, अशी नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे शिक्षण विभागाच्या सूचनांत म्हटले आहे. ---जिल्ह्यात ७९६५ अर्जआरटीईनुसार जिल्ह्यातील ३९६ शाळांत ३५४१ जागा भरायच्या आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातून ७ हजार ६५ अर्ज दाखल झाले होते.पैकी ३३८२ विद्यार्थ्यांची निवड लॉटरीतून झालेली आहे. इतर जण प्रतीक्षा यादीत आहेत.