शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:27 IST

छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येस दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.

अहमदनगर : छावण्या बंद केल्यामुळे शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येस दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयातील आंदोलन स्थगित करण्यात आले.छावणी सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी वसंत सदाशिव झरेकर (रा. घोसपुरी, ता. नगर) यांनी आत्महत्या केली. त्यामुळे घोसपुरी ग्रामस्थ व शिवसेनेच्या वतीने जिल्हा रूग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.महसूल प्रशासनाने जाणूनबुजून छावण्या बंद केल्या. जनांवरे उपाशी मरत असल्यामुळे या छावण्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी दोनच दिवसांपूर्वी नगर तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातही संबंधित शेतकरी सहभागी झाला होता. परंतु शासन छावण्या सुरू करत नसल्याने व्यथित होत त्याने आत्महत्या केली. त्यामुळे दोषी महसूल अधिकाºयांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, सायंकाळी विधानसभेचे उपसभापती विजय औटी, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, छावणीची मागणी करताना शेतकºयाचा मृत्यू होणे, हे निश्चितच खेदजनक आहे. शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असताना जिल्हा प्रशासनाने छावण्या बंद करणे चुकीचे आहे. आज शेतकºयाने आत्महत्या केली तर जिल्हा प्रशासनाच्या एखाद्या तरी अधिकाºयाने घटनास्थळी जाणे गरजेचे होते. आंदोलकांची मागणी लक्षात घेता या प्रकरणात अधिकाºयांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपण व औटी दोघेही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे विखे यांनी सांगितले. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शेतकरी आत्महत्येस केवळ जिल्हा प्रशासनच जबाबदार आहे. छावण्या सुरू न झाल्यास शेतकरी सामूहिक आत्महत्या करतील असे पत्रच ३० आॅगस्टला सर्व शेतक-यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. तरीही शासनाने दखल घेतली नाही व शेतक-याचा बळी गेला. त्यामुळे महसूल अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. - बाळासाहेब हराळ, माजी जि.प. सदस्यदोन दिवसांपूूर्वी शिवसेनेने छावण्यांसाठी केलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करून सर्व आंदोलकांना अटक झाली. तेव्हाच छावणी सुरू केली असती तर शेतक-याचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे जिल्हा प्रशासनच यास जबाबदार आहे. - संदेश कार्ले, जि. प. सदस्य

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय