शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

शेतक-यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी राज्याची तिजोरी खुली केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 14:03 IST

शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही.

नेवासा : शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही. कपाशी बोंडअळीचे नुकसान दिले आहे. आमच्या ४ वर्षाच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त खरेदी आम्ही केली. शेतक-यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी राज्याची तिजोरी आम्ही खुली केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.शिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या पवित्र स्थानी शेतकरी-वारकरी एकत्र आले आहेत. शेतकरी हा वारकरी आहे आणि वारकरी हा शेतकरी आहे. ख-या अर्थाने वारकरी व शेतक-यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे.या महाराष्ट्रात शेतक-यांच्या समस्या मोठ्या आहेत. सध्या दुष्काळ समोर आहे. मात्र आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे. हे मागील कोणत्याही सरकार करू शकले नाही. कर्जमाफी योजनेमध्ये एकट्या नगर जिल्ह्यात साडेतेराशे कोटी रुपये मिळाले. राज्यात २१ हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून दिले. हे कोणत्याही सरकार करू शकले नाही.आजही आम्ही कर्जमाफी योजना थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही. आज बोंडअळीचे नुकसान दिले आहे. जलयुक्त शिवार योजना राबविली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. शेतक-यांना पाणी मिळण्यासाठी आम्ही काम केले. दुधाचे भाव आम्ही वाढविले. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही.तत्पुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांनी अभिषेक करून शनी दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शेतकरी-वारकरी महासंमेलानाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.यावेळी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे खासदार दिलीप गांधी, संभाजी दहातोंडे होते.याआधीच्या सरकारमधील नेतेच गब्बर झालेआमच्या कोणतयाही संस्था नाहीत. आम्हाला जनतेसाठी राज्य करायचे आहे. प्रामाणिकपणे काम आम्ही करत आहोत. याआधीच्या सरकारने जनतेची चेष्टा केली. स्वत:च्या संस्था मोठ्या केल्या. जनतेच्या जीवावर स्वत: मोठे झाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस