शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

यापुढील प्रत्येक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:58 IST

समता परिषदेच्या यापुढील सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली.

श्रीरामपूर : समता परिषदेच्या यापुढील सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या अपप्रवृत्तींवर गुन्हा दाखल होत नाही. मात्र, मनुस्मृती जाळल्यास गुन्हे दाखल होतात, अशी टीका भुजबळ यांनी केली.श्रीरामपूर येथे बुधवारी जयंत ससाणे यांच्या निधनानंतर ससाणे कुटुंबीयांच्या निवासस्थानी सांत्वनाकरिता ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.भुजबळ म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लोकसभेच्या जागावाटपाकरिता बैैठका होत आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १७ जागांवर एकमत झाले आहे. १४ जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घेतले जाईल. काही जागांबाबत बोलणी सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले. समता परिषदेच्या कामांना गती देण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैैठक घेत आहोत. हजारीबाग, रांची येथे मेळावे घेणार आहोत. डावे पक्षदेखील आपल्यासोबत आहेत. पुढील काळात युवकांना परिषदेत सामावून घेऊ. राज्य सरकारने मराठा व धनगर प्रश्नावर केवळ गाजर दाखविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. त्यात सत्ता मिळविण्यासाठी निवडणूक प्रचारात घोषणा केली. भाजपचे सरकार येणार असल्याची शक्यता नव्हती ही कबुली गडकरी यांनी दिली आहे, असे आरक्षणाच्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले.नगर-नाशिक व मराठवाड्याच्या पाणी संघर्षावर भुबजळ यांनी भाष्य केले. या कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय त्याची दुरूस्ती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, नगर दक्षिणेची जागा युवा नेते डॉ.सुजय विखे यांना सोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न करावेत, अशी मागणी करण ससाणे यांनी भुजबळ यांच्याकडे केली.सभापती सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, मुळा-प्रवराचे उपाध्यक्ष जी.के.पाटील, संजय फंड, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, माजी सभापती नानासाहेब पवार, आशिष धनवटे, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फंड, नानासाहेब शिंदे, सुनील कुदळे आदी यावेळी उपस्थित होते. सुयोग मंगल कार्यालयात भुजबळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.ससाणे यांनी विकास केलादिवंगत ससाणे यांच्याशी आपला कौटुंबिक स्नेह होता. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा समान धागा आमच्यात होता. पंकज भुजबळ यांच्या निवडणुकीत ससाणे यांनी मदत केली. काँग्रेसच्या आमदारांचा त्यांनी पाठिंबा मिळविला होता. दिल्लीत अनेक खात्याच्या सचिवांशी त्यांचे मैैत्रीपूर्ण संबंध होते. त्या माध्यमातून मोठी कामे करून दिली. ससाणे यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी करण यांना ताकद देऊ, अशी ग्वाही भुजबळ यांनी ससाणे समर्थकांच्या उपस्थितीत दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर