शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर बहर येत आहे. याबरोबरच कांद्याचा डोंगळा, डाळिंब, टोमॅटो, मोहरी आदी पिकांवर चांगल्या प्रकारे फुले आलेली ...

सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर बहर येत आहे. याबरोबरच कांद्याचा डोंगळा, डाळिंब, टोमॅटो, मोहरी आदी पिकांवर चांगल्या प्रकारे फुले आलेली आहेत. या फुलांमध्ये फळधारणा होण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे रासायनिक फवारणीचे प्रमाण वाढत चालले आहे. या मोसमात आंब्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर बहर आलेला असतो. या झाडांवर मधमाशाही घोंगावतात. झाडांवरच एकत्र येत मोहळ तयार करतात. यापाठोपाठ कांद्याच्या बियांच्या डोंगळ्यालाही फुले आलेली असतात. त्यामुळे मधमाशांची संख्या अधिक असते. मात्र, यावर्षी सतत हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी फळबागांवर आंब्याच्या झाडांसह सर्रास फवारणी केली आणि या रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या कमी झाली. याचा परिणाम फळधारणेवर झालेला दिसून येत आहे.

.........

माझ्या शेतात साठ केशर आणि हापूस आंब्याची झाडे लावलेली आहेत. यावर्षी झाडांना बहर चांगला आला होता. मात्र, हवामानात सतत बदल झाल्याने एकदा रासायनिक फवारणी केली. मात्र, त्यामुळे मधमाशा गायब झाल्या आहेत. याचा परिणाम फळधारणेवर झाला असल्याने मी मधमाशांच्या तयार पेट्या घेण्याच्या विचार करीत आहे.

-रामहरी कानवडे, अंबड, ता. अकोले

..............

फळपिकांमध्ये कळी सेट होण्याकरिता मधमाशी मुख्य भूमिका बजावत असते. परागीभवनाच्या क्रियेत पुंकेशर हे मादी फुलांतील स्त्रीकेशरांपर्यंत परागकण वहन करतात. यातून बीजधारणेची प्रक्रिया होते. अधिक प्रमाणात होत असलेल्या रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे काही फुलांमध्ये परागीकरण प्रक्रियेवर त्याचा परिणाम दिसत असून, काही फुलांमध्ये बीजधारणा होत नसल्याने फुले गळून पडतात.

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी