शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST

सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर बहर येत आहे. याबरोबरच कांद्याचा डोंगळा, डाळिंब, टोमॅटो, मोहरी आदी पिकांवर चांगल्या प्रकारे फुले आलेली ...

सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर बहर येत आहे. याबरोबरच कांद्याचा डोंगळा, डाळिंब, टोमॅटो, मोहरी आदी पिकांवर चांगल्या प्रकारे फुले आलेली आहेत. या फुलांमध्ये फळधारणा होण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे रासायनिक फवारणीचे प्रमाण वाढत चालले आहे. या मोसमात आंब्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर बहर आलेला असतो. या झाडांवर मधमाशाही घोंगावतात. झाडांवरच एकत्र येत मोहळ तयार करतात. यापाठोपाठ कांद्याच्या बियांच्या डोंगळ्यालाही फुले आलेली असतात. त्यामुळे मधमाशांची संख्या अधिक असते. मात्र, यावर्षी सतत हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी फळबागांवर आंब्याच्या झाडांसह सर्रास फवारणी केली आणि या रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या कमी झाली. याचा परिणाम फळधारणेवर झालेला दिसून येत आहे.

.........

माझ्या शेतात साठ केशर आणि हापूस आंब्याची झाडे लावलेली आहेत. यावर्षी झाडांना बहर चांगला आला होता. मात्र, हवामानात सतत बदल झाल्याने एकदा रासायनिक फवारणी केली. मात्र, त्यामुळे मधमाशा गायब झाल्या आहेत. याचा परिणाम फळधारणेवर झाला असल्याने मी मधमाशांच्या तयार पेट्या घेण्याच्या विचार करीत आहे.

-रामहरी कानवडे, अंबड, ता. अकोले

..............

फळपिकांमध्ये कळी सेट होण्याकरिता मधमाशी मुख्य भूमिका बजावत असते. परागीभवनाच्या क्रियेत पुंकेशर हे मादी फुलांतील स्त्रीकेशरांपर्यंत परागकण वहन करतात. यातून बीजधारणेची प्रक्रिया होते. अधिक प्रमाणात होत असलेल्या रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे काही फुलांमध्ये परागीकरण प्रक्रियेवर त्याचा परिणाम दिसत असून, काही फुलांमध्ये बीजधारणा होत नसल्याने फुले गळून पडतात.

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी