शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
5
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
6
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
7
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
8
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
9
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
10
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
11
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
12
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
13
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
14
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
15
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
16
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
17
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
18
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
19
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
20
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?

‘तुकाई’प्रकरणी शिंदेंकडून फसवणूक : कैलास शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 12:50 IST

तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत

कर्जत : तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत. त्यामुळे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.शेवाळे म्हणाले, कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायक ठरणाºया तुकाई चारीच्या मागणीला फाटा देत पालकमंत्री राम शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन योजना केली. या योजनेची संकल्पना ही पाईपद्वारे तलावात पाणी नेण्याची असल्याने लिफ्टपासून तलावात पाणी मोठ्या पाईपद्वारे जाणार असल्याने मधल्या भागातील शेतकºयांना याचा कसलाही फायदा होणार नाही. मात्र खर्च शेतकºयांच्या माथी मारला जाणार आहे. जनतेची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता लाभक्षेत्रातील गावांसाठी चारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकºयांची फसवणूक करणे थांबवावे.कर्जत तालुक्यात अवर्षण प्रवर्ग क्षेत्रातील गुरव पिंपरी, मिरजगाव, कोंभळी, चिंचोली काळदात, टाकळी खंडेश्वरी यांच्यासह २१ गावांना वरदान ठरू शकणारी तुकाई चारी होण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. या परिसरातील बाळासाहेब सूर्यवंशी दोन वर्षांपासून तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २ हजार हेक्टरला उपयोगी ठरू शकणारी तुकाई चारी व्हावी या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावत अवघ्या ५९९ हेक्टरला फक्त लाभ देणारी व पाईपलाईनद्वारे पाणी तलावात सोडणारी तुकाई उपसा सिंचन योजना जलसंधारण विभागाकडून जाहीर केली आहे.जलसंपदा विभागामार्फत तुकाई चारी पद्धतीच्या योजना राबविणे आवश्यक असताना सिंचन योजनेसाठी जलसंधारण विभागाचा निधी वापरत जनतेची फसवणूक केली जात आहे.तुकाई योजना ही चारीद्वारेच व्हावी अशी लाभार्थी शेतकºयांची मागणी आहे. २१ गावातील २हजार हेक्टरला त्यांचा फायदा होऊ शकणाºया चाºयांसाठी १५ कोटी रूपये खर्च प्रस्तावित केला होता. मात्र इस्त्रायल पद्धतीची उपसा योजना करण्यासाठी ६१ कोटी रूपये देण्याची घोषणा केली गेली. या चौपट होणाºया खर्चात फक्त तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार असून त्याचा लाभ तलावाच्या आसपासच्या शेतकºयांनाच होणार आहे.याशिवाय अवघ्या १०० दलघफू पाण्यात किती तलाव भरले जाणार आहेत? तुकाई चारीच्या नावाखाली परिसरातील लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे षडयंत्र लोकप्रतिनिधीद्वारे आखले जात आहे. या योजनेद्वारे ५९९ हेक्टर क्षेत्रास लाभ होईल हे कसे काढले? यासह यामध्ये कोणते गाव व क्षेत्र असणार आहे? याचा खुलासा अधिकाºयांना मागणार असल्याचे अ‍ॅड. शेवाळे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत