शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘तुकाई’प्रकरणी शिंदेंकडून फसवणूक : कैलास शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 12:50 IST

तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत

कर्जत : तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांनी संजीवनी ठरणारी तुकाई चारी ही उपसा सिंचन योजनेच्या नावाने फसवणूक मंजूर करून शेतकºयांना फसवित आहेत. त्यामुळे शेतकºयांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.शेवाळे म्हणाले, कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायक ठरणाºया तुकाई चारीच्या मागणीला फाटा देत पालकमंत्री राम शिंदे यांनी तुकाई उपसा सिंचन योजना केली. या योजनेची संकल्पना ही पाईपद्वारे तलावात पाणी नेण्याची असल्याने लिफ्टपासून तलावात पाणी मोठ्या पाईपद्वारे जाणार असल्याने मधल्या भागातील शेतकºयांना याचा कसलाही फायदा होणार नाही. मात्र खर्च शेतकºयांच्या माथी मारला जाणार आहे. जनतेची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता लाभक्षेत्रातील गावांसाठी चारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकºयांची फसवणूक करणे थांबवावे.कर्जत तालुक्यात अवर्षण प्रवर्ग क्षेत्रातील गुरव पिंपरी, मिरजगाव, कोंभळी, चिंचोली काळदात, टाकळी खंडेश्वरी यांच्यासह २१ गावांना वरदान ठरू शकणारी तुकाई चारी होण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध आंदोलने सुरू आहेत. या परिसरातील बाळासाहेब सूर्यवंशी दोन वर्षांपासून तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करीत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २ हजार हेक्टरला उपयोगी ठरू शकणारी तुकाई चारी व्हावी या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावत अवघ्या ५९९ हेक्टरला फक्त लाभ देणारी व पाईपलाईनद्वारे पाणी तलावात सोडणारी तुकाई उपसा सिंचन योजना जलसंधारण विभागाकडून जाहीर केली आहे.जलसंपदा विभागामार्फत तुकाई चारी पद्धतीच्या योजना राबविणे आवश्यक असताना सिंचन योजनेसाठी जलसंधारण विभागाचा निधी वापरत जनतेची फसवणूक केली जात आहे.तुकाई योजना ही चारीद्वारेच व्हावी अशी लाभार्थी शेतकºयांची मागणी आहे. २१ गावातील २हजार हेक्टरला त्यांचा फायदा होऊ शकणाºया चाºयांसाठी १५ कोटी रूपये खर्च प्रस्तावित केला होता. मात्र इस्त्रायल पद्धतीची उपसा योजना करण्यासाठी ६१ कोटी रूपये देण्याची घोषणा केली गेली. या चौपट होणाºया खर्चात फक्त तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार असून त्याचा लाभ तलावाच्या आसपासच्या शेतकºयांनाच होणार आहे.याशिवाय अवघ्या १०० दलघफू पाण्यात किती तलाव भरले जाणार आहेत? तुकाई चारीच्या नावाखाली परिसरातील लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे षडयंत्र लोकप्रतिनिधीद्वारे आखले जात आहे. या योजनेद्वारे ५९९ हेक्टर क्षेत्रास लाभ होईल हे कसे काढले? यासह यामध्ये कोणते गाव व क्षेत्र असणार आहे? याचा खुलासा अधिकाºयांना मागणार असल्याचे अ‍ॅड. शेवाळे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत