शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

महाराष्ट्राला अस्थिरतेकडे घेऊन जाणारांना चांगलीच चपराक-राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:19 IST

फडणवीस यांच्या पुन्हा येण्याने राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणारांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

लोणी : पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हा विश्वास होता. फडणवीस यांच्या पुन्हा येण्याने राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणारांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.राज्यात शनिवारी सकाळी मोठा राजकीय भूकंप बसला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सोडून भाजपवासीय झालेले माजीमंत्री राधाकृष्ण विखे सध्या कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनाला पडला होता. मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने सुरू असताना विखे हे शनिवारी सकाळी आपल्या शिर्डी मतदारसंघातच होते. सकाळी ९.३० वाजता प्रवरानगर (ता.राहाता) येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बाँयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी विखे उपस्थित झाले होते. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना गराडा घातला. राज्यातील जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला मतदान केलेले आहे. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांना संधी दिली होती. भाजपच सरकार स्थापन करेल हा आम्हाला  विश्वास होता, अशी प्रतिक्रिया विखे यांनी दिली. कार्यक्रमानंतर दुपारी दोन वाजता शिर्डी येथून विखे हे विमानाने मुंबईकडे रवाना झाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील