शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सत्ता परिवर्तन करा

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले. आघाडी सरकारने सिंचनामध्ये केलेल्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पैसे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले असते तर याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोनं पिकवलं असते, असेही त्या म्हणाल्या. नेवासा व मिरजगाव येथील भाजपाच्या प्रचार सभेत स्मृती इराणी या बोलत होत्या. यावेळी स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, मोठ्या संघर्षानंतर केंद्रात परिवर्तन झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही परिवर्तन होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आहे. शेतकऱ्यांच्या भूमीवरच काँग्रेस आघाडीच्या राजवटीत शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार जनता विसरली नाही. १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता वनवास भोगत आहे. १५ आॅक्टोबरला मतदान करून हा वनवास संपवा. देशात गेली ६० वर्षे काँग्रेस सरकारने गरिबी हटाव म्हणून देशात गरिबी वाढवण्याचे पाप केले असून, यापुढे देशातील प्रत्येक व्यक्ती सधन होण्यासाठी ‘जन-धन’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक योजना सामान्यांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहनही इराणी यांनी केले. मिरजगाव येथील सभेत खा.दिलीप गांधी, जामखेड-कर्जत मतदारसंघाचे उमेदवार आ. राम शिंदे, आष्टी-पाटोद्याचे उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, गुलाब तनपुरे, रमेश झरकर, सुवर्णा पाचपुते, शांतीलाल कोपनर, भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे आदी उपस्थित होते.नेवासा येथील सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे होते. यावेळी नेवासा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे अनिल ताके, सचिन देसर्डा, अंबादास कोरडे, नवनीतभाई सुरपुरिया, बाबासाहेब खराडे, रामभाऊ खंडाळे, संदीप आलवणे, बाबा कांगुणे, नामदेव खंडागळे, भाऊसाहेब वाघ, पोपटराव जीरे, रहेमानभाई पिंजारी, अ‍ॅड. विश्वास काळे, बाळासाहेब कुलकर्णी, महिला आघाडीच्या यमुनाताई रेळकर आदी उपस्थित होते. भास्कर कणगरे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)