शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

राज्यात सत्ता परिवर्तन करा

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले. आघाडी सरकारने सिंचनामध्ये केलेल्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पैसे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले असते तर याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोनं पिकवलं असते, असेही त्या म्हणाल्या. नेवासा व मिरजगाव येथील भाजपाच्या प्रचार सभेत स्मृती इराणी या बोलत होत्या. यावेळी स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, मोठ्या संघर्षानंतर केंद्रात परिवर्तन झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही परिवर्तन होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आहे. शेतकऱ्यांच्या भूमीवरच काँग्रेस आघाडीच्या राजवटीत शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार जनता विसरली नाही. १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता वनवास भोगत आहे. १५ आॅक्टोबरला मतदान करून हा वनवास संपवा. देशात गेली ६० वर्षे काँग्रेस सरकारने गरिबी हटाव म्हणून देशात गरिबी वाढवण्याचे पाप केले असून, यापुढे देशातील प्रत्येक व्यक्ती सधन होण्यासाठी ‘जन-धन’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक योजना सामान्यांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहनही इराणी यांनी केले. मिरजगाव येथील सभेत खा.दिलीप गांधी, जामखेड-कर्जत मतदारसंघाचे उमेदवार आ. राम शिंदे, आष्टी-पाटोद्याचे उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, गुलाब तनपुरे, रमेश झरकर, सुवर्णा पाचपुते, शांतीलाल कोपनर, भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे आदी उपस्थित होते.नेवासा येथील सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे होते. यावेळी नेवासा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे अनिल ताके, सचिन देसर्डा, अंबादास कोरडे, नवनीतभाई सुरपुरिया, बाबासाहेब खराडे, रामभाऊ खंडाळे, संदीप आलवणे, बाबा कांगुणे, नामदेव खंडागळे, भाऊसाहेब वाघ, पोपटराव जीरे, रहेमानभाई पिंजारी, अ‍ॅड. विश्वास काळे, बाळासाहेब कुलकर्णी, महिला आघाडीच्या यमुनाताई रेळकर आदी उपस्थित होते. भास्कर कणगरे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)