शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जिल्ह्यातील खरिपात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:00 IST

१५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात.

गोरख देवकरअहमदनगर : १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात. उशिरा का होईना कर्नाटकच्या किनाऱ्यावर आलेला मान्सून ‘वायू’ वादळामुळे पुन्हा रेंगाळला आहे. खरीप हंगामाच्या शेती मशागतीसह बियाणे, खते यांचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांपुढील संकट पुन्हा गडद झाले आहे.भीषण दुष्काळाच्या चटक्यानंतर यंदा तरी २४ ते २५ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी आणि वादळ, वाºयाने झालेले नुकसानच अधिक अशी अवस्था आहे. हा पाऊस अल्प दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांची बाजरीला सर्वाधिक पसंती असते. याशिवाय शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा परिसरात कपाशीची लागवड प्रामुख्याने केली जाते. कर्जत, जामखेड तालुक्यात उडीद लागवड होते.श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. पारनेर तालुक्यात वाटाणा, मूग लागवड सर्वाधिक होते. जिल्ह्यात नियमित खरिपाचे क्षेत्र ४ लाख७८ हजार ६३८ हेक्टर असते. यंदा २०१९ मध्ये खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ५ लाख ३४ हजार २७० हेक्टर आहे. त्यासाठीचे बियाणे, खतांचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे.मान्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास मूग, वाटाणा, कपाशी पिकांच्या पेºयामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. पेरणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना मार्गदर्शनराज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांची लागवड, रोग, त्यावरील उपाययोजनांबाबत ‘रोहिणी नक्षत्र पंधरवाडा’ उपक्रम राबविण्यात आला. ५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले.च्यावेळी मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील बोंड अळी, उसावरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली.दीड लाख मेट्रिक टन खतेच्खरीप हंगामातील पिकांसाठी २ लाख २ हजार ४५१ मेट्रिक टन खतांची कृषी विभागाने मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५९ हजार ८६० मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. यामध्ये युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांचा समावेश आहे. याशिवाय ७० हजार १२९ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना ३६ हजार ५५५ क्विंटलचा पुरवठा झाला आहे.कपाशीची ३ लाख ३४ हजार ८२२ पाकिटेजिल्ह्यातील खरिपासाठी कृषी विभागाने ४ लाख ७५ हजार ९२९ कपाशी बियाणे पाकिटाची नोंद केली होती. त्यानुसार ३ लाख ३४ हजार ८२२ बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय