शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील खरिपात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:00 IST

१५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात.

गोरख देवकरअहमदनगर : १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात. उशिरा का होईना कर्नाटकच्या किनाऱ्यावर आलेला मान्सून ‘वायू’ वादळामुळे पुन्हा रेंगाळला आहे. खरीप हंगामाच्या शेती मशागतीसह बियाणे, खते यांचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांपुढील संकट पुन्हा गडद झाले आहे.भीषण दुष्काळाच्या चटक्यानंतर यंदा तरी २४ ते २५ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी आणि वादळ, वाºयाने झालेले नुकसानच अधिक अशी अवस्था आहे. हा पाऊस अल्प दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांची बाजरीला सर्वाधिक पसंती असते. याशिवाय शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा परिसरात कपाशीची लागवड प्रामुख्याने केली जाते. कर्जत, जामखेड तालुक्यात उडीद लागवड होते.श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. पारनेर तालुक्यात वाटाणा, मूग लागवड सर्वाधिक होते. जिल्ह्यात नियमित खरिपाचे क्षेत्र ४ लाख७८ हजार ६३८ हेक्टर असते. यंदा २०१९ मध्ये खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ५ लाख ३४ हजार २७० हेक्टर आहे. त्यासाठीचे बियाणे, खतांचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे.मान्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास मूग, वाटाणा, कपाशी पिकांच्या पेºयामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. पेरणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना मार्गदर्शनराज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांची लागवड, रोग, त्यावरील उपाययोजनांबाबत ‘रोहिणी नक्षत्र पंधरवाडा’ उपक्रम राबविण्यात आला. ५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले.च्यावेळी मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील बोंड अळी, उसावरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली.दीड लाख मेट्रिक टन खतेच्खरीप हंगामातील पिकांसाठी २ लाख २ हजार ४५१ मेट्रिक टन खतांची कृषी विभागाने मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५९ हजार ८६० मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. यामध्ये युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांचा समावेश आहे. याशिवाय ७० हजार १२९ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना ३६ हजार ५५५ क्विंटलचा पुरवठा झाला आहे.कपाशीची ३ लाख ३४ हजार ८२२ पाकिटेजिल्ह्यातील खरिपासाठी कृषी विभागाने ४ लाख ७५ हजार ९२९ कपाशी बियाणे पाकिटाची नोंद केली होती. त्यानुसार ३ लाख ३४ हजार ८२२ बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय