शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्ह्यातील खरिपात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:00 IST

१५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात.

गोरख देवकरअहमदनगर : १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात. उशिरा का होईना कर्नाटकच्या किनाऱ्यावर आलेला मान्सून ‘वायू’ वादळामुळे पुन्हा रेंगाळला आहे. खरीप हंगामाच्या शेती मशागतीसह बियाणे, खते यांचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांपुढील संकट पुन्हा गडद झाले आहे.भीषण दुष्काळाच्या चटक्यानंतर यंदा तरी २४ ते २५ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी आणि वादळ, वाºयाने झालेले नुकसानच अधिक अशी अवस्था आहे. हा पाऊस अल्प दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकºयांची बाजरीला सर्वाधिक पसंती असते. याशिवाय शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा परिसरात कपाशीची लागवड प्रामुख्याने केली जाते. कर्जत, जामखेड तालुक्यात उडीद लागवड होते.श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सोयाबीनला पसंती देतात. पारनेर तालुक्यात वाटाणा, मूग लागवड सर्वाधिक होते. जिल्ह्यात नियमित खरिपाचे क्षेत्र ४ लाख७८ हजार ६३८ हेक्टर असते. यंदा २०१९ मध्ये खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ५ लाख ३४ हजार २७० हेक्टर आहे. त्यासाठीचे बियाणे, खतांचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे.मान्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास मूग, वाटाणा, कपाशी पिकांच्या पेºयामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. पेरणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना मार्गदर्शनराज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांची लागवड, रोग, त्यावरील उपाययोजनांबाबत ‘रोहिणी नक्षत्र पंधरवाडा’ उपक्रम राबविण्यात आला. ५०० शेतीशाळांद्वारे शेतकºयांना एकत्र करून मार्गदर्शन करण्यात आले.च्यावेळी मक्यावरील लष्करी अळी, कपाशीवरील बोंड अळी, उसावरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शेतकºयांना माहिती देण्यात आली.दीड लाख मेट्रिक टन खतेच्खरीप हंगामातील पिकांसाठी २ लाख २ हजार ४५१ मेट्रिक टन खतांची कृषी विभागाने मागणी केली होती. त्यापैकी १ लाख ५९ हजार ८६० मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. यामध्ये युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांचा समावेश आहे. याशिवाय ७० हजार १२९ क्विंटल बियाण्यांची मागणी असताना ३६ हजार ५५५ क्विंटलचा पुरवठा झाला आहे.कपाशीची ३ लाख ३४ हजार ८२२ पाकिटेजिल्ह्यातील खरिपासाठी कृषी विभागाने ४ लाख ७५ हजार ९२९ कपाशी बियाणे पाकिटाची नोंद केली होती. त्यानुसार ३ लाख ३४ हजार ८२२ बियाणे पाकिटे उपलब्ध झाली आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय