शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:26 IST

नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

नेवासा : नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेनेते दशरथ सावंत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.        नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये दुपारी झालेल्या रास्तारोको प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ.अशोकराव ढगे यांनी आलेल्या शेतक-यांचे स्वागत केले. राज्याचे उपाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक करतांना शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येऊन ७/१२ कोरा करण्यात यावा. कृषिपंपाचे वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे. एफ.आर.पी.प्रमाणे एक रकमी व सरकारी अनुदान मिळावे. दुष्काळ निधी किमान पाच हजार एकराप्रमाणे शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. कांदा आणि दुधास शासकीय अनुदान मिळावे. शेतक-यांना पेन्शन अनुदान योजना लागू करावी. अशा मागण्या त्यांनी यावेळी बोलताना मांडल्या.    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास कोरडे, संघटनाध्यक्ष प्रकाश पोकळे, गुलाबराव डेरे, प्रताप पटारे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांची यावेळी भाषणे झाली. सदरचा रास्तारोको अर्धा तास चालला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शेतकरी नेते पी.आर.जाधव यांनी आभार मानले. यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा