शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:39 IST

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली.

कोपरगाव : केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली.कोपरगाव येथे संविधान बचाव रॅलीनिमित्त आंबेडकर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप सरकारने गॅस सबसिडीच्या ४० हजार कोटी रुपयांचे काय केले? याचा हिशेब नाही. भीमा कोरेगाव प्रकरणात दोषींना जामीन मिळत असेल, तर २०१९ ला भाजपचे काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही़ अर्थसंकल्पात कधीही भाववाढ नसते. शेतक-यांना दीडपट भाव वाढवून दिला. पण शेतीमूल्यात ती रक्कम प्रतिवर्धित झालेली नाही. आजची स्थिती आटोक्याबाहेर जाणारी आहे. बाजार एकत्रिकरणाची सोय सरकारने कोलमडून टाकली आहे. त्यामुळे पुन्हा महागाईचा भडका उडेल. नाण्यांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प वास्तवात येणारा नाही. अनियंत्रित संघटना या देशाचे भविष्य ठरवायला लागल्या आहेत. काँग्रेस व भाजप हे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, अशा शब्दात आंबेडकर यांनी टीका केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरKopargaonकोपरगाव