शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूरवाडीत खडीक्रशरच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ

By admin | Updated: April 7, 2017 17:55 IST

खडी क्रशरच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट खडी क्रशर बंद करुन तेथील साहित्याला आग लावल्याची घटना शुक्रवारी घडली़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ७- नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे असणाऱ्या खडी क्रशरच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट खडी क्रशर बंद करुन तेथील साहित्याला आग लावल्याची घटना शुक्रवारी घडली़ त्यामुळे कापूरवाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे जवळपास २० खडी क्रशर आहेत. यातील काही गावातील लोकांचे तर काही बाहेरच्या लोकांच्या मालकीची आहेत. खडी क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे गावकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. यातून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने काही महिन्यांपूर्वीच गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन खडी क्रशर बंद करण्याची मागणी केली होती. क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत असल्याची गंभीर बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी गावातील काही महिला व गावकरी एकत्र जमले. त्यांनी थेट खडी क्रशर केंद्रावर जाऊन खडी क्रशर बंद केले. तसेच तेथील यंत्र सामुग्रीची जाळपोळ करत आपला संताप व्यक्त केला. खडी क्रशर चालकांनी धुळीचा बंदोबस्त करायला हवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावातील काही शेतकऱ्यांची जमीन या क्रशरच्या धुळीमुळे नापीक होत आहे़ जिल्हाधिकारी करणार पाहणीकापूरवाडी येथील खडी क्रशरच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याची गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिल्याने शुक्रवारी जाळपोळ व तोडफोडीचा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल कवडे हे शनिवारी कापूरवाडीत भेट देऊन क्रशरची पाहणी करून गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.खडी क्रशर जवळच शाळाकापूरवाडी येथील खडी क्रशच्या जवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे. या क्रशरमधून बाहेर पडणारी धूळ व त्यातील आवाज यांचा त्रास या शाळकरी मुलांना होत आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांना येथे शिक्षणही घेता येत नाही़ त्यामुळे पालकांमध्ये संताप होता़