शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नगर तालुक्यातील १० गावांचा कोरोनाला बाय-बाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

केडगाव : कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडत नगर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला बाय-बाय केले आहे. या गावात सध्या सक्रिय रुग्णांची ...

केडगाव : कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडत नगर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला बाय-बाय केले आहे. या गावात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. आणखी १५ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. यात २६० जणांचा यात बळी गेला. तालुक्यात १२ हजार ८५६ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. ११ हजार ३४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात ९ हजार ८२४ जणांना कोरोनाची बाधा झाली.

आदर्श गाव हिवरेबाजारने कोरोनामुक्तीचा संकल्प केला आहे. सोनेवाडी, जांब, भोयरे खुर्द, देऊळगाव सिद्धी, गुणवडी, पिंप्रीघुमट, नांदगाव, कोळपे आखाडा, निमगाव घाणा, हमिदपूर या गावांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या या गावात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. पिंपळगाव लांडगा, आव्हाडवाडी, निबोंडी, मदडगाव, गुंडेगाव, आंबिलवाडी, पारगाव मौला, जखणगाव या गावात सक्रिय रुग्णांची संख्या प्रत्येकी एकवर आली असून बारदरी, शहापूर, साकत, दहिगाव, वडगाव तांदळी, वाटेफळ ही गावे ही कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

---

नांदगावने वापरली मतदानासारखी यंत्रणा

मतदानाच्या वेळी मतदारांना मतदान करण्यासाठी जशी यंत्रणा वापरतो तशीच यंत्रणा कोरोना रुग्णाला कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी वापरली. कोरोना समितीमधील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आम्ही सर्वांनी गाव पिंजून काढले. रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला लगेच वाहनाची व्यवस्था करून कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल करत होतो. काही रुग्णाला तर घरी जाऊन उचलून कोविड सेंटरला पोहोच केले. प्रचारात ज्या पद्धतीने वाहन यंत्रणा वापरतो तशीच यंत्रणा दवाखान्यात पोहच करण्यासाठी वापरली. सात दिवस कडक जनता कर्फ्यू केला होता. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती सरपंच सखाराम सरक यांनी दिली.

---

नागरिकांचा रोष ओढावला मात्र हमिदपूर कोरोनामुक्त केले

हमीदपूर ग्रामपंचायतीने कडक लॉकडाऊन केल्यामुळे आज गावात एकही कोरोना रुग्ण नाही. गावात १० ते १२ कोरोना रुग्ण होते. ती संख्या वाढू नये यासाठी कोरोना समिती कडक कार्यवाही सुरू केली. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळही आली. गावात वाड्यावस्त्यावर प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी केली. दोन वेळेस तपासणी केली. गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली. चौकाचौकात बसणारे तरुण वर्गांनी समजून सांगितल्यामुळे चौकात होणारी गर्दी एकदम कमी झाली. दहा दिवस नागरिकांचा संपर्क होऊन नाही दिला. घरोघरी जाऊन जनजागृती केली, अशी माहिती छबुराव कांडेकर यांनी दिली. सरपंच नीलेश वैराळ, उपसरपंच प्रमिला कांडेकर, ग्रामसेवक देवीदास जाधव यांचेही सहकार्य लाभले.

---

गावकऱ्यांच्या एकीने गुणवडीला फायदा...

गुणवडी गावाला ग्रामस्थांच्या एकीने फायदा झाला. गाव कोरोनामुक्त झाले. गावात सध्या एकही करोना रुग्ण नाही. हे सर्व सरपंच रंजना श्याम साळवे, उपसरपंच रावसाहेब शेळके व कोरोना ग्रामस्तरीय समिती यांच्या नियोजनासह माजी सरपंच वाल्मीक नागवडे, माजी सरपंच महेंद्र शेळके, सामाजिक कार्यकर्ते योगेश शेळके, दत्तात्रय कुटे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश शेळके, राजेंद्र कोकाटे, अमोल नागवडे, सुनील शेळके, ग्रामसेविका के. बी. शिंदे, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाले. डॉ. नितीन शेळके, डॉ. संजय शेळके, डॉ. भागवत बिभिशन यांनी गावातील रुग्णांची काळजी घेऊन इतर आजार व कोरोनावर नियंत्रण ठेवले.

---

ग्रामपंचायत मार्फत गावातील सर्व व्यावसायिकांना व ग्रामस्थांना लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. तसेच गावातील रुग्णांना सेवा देणारे डॉ. किरण गणबोटे यांनीही रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसली की लगेच तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

- प्रा. घनश्याम गिरवले,

सरपंच, देऊळगाव सिद्धी