शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बंधाºयांच्या ६ हजार फळ्या गंजल्या

By मिलिंदकुमार साळवे | Updated: August 19, 2017 16:19 IST

गोदावरी नदीवरील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील तसेच प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील ६ हजार ३१४ लोखंडी फळ्यांवर गंज चढल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. लोखंडी फळ्या बदलण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर साडेपाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

ठळक मुद्देडाऊच, हिंगणी, खेडलेझुगे, माहेगाव, शिंगवे, मंजूर हे कोपरगाव तालुक्यातील, सडे, शिंगवे, पुणतांबा हे राहाता तालुक्यातील बंधारे तसेच नाशिक जिल्ह्यातील वडगाव कानळद, रौवळस, शिरसगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील फळ्या गंजल्या आहेत.

अहमदनगर : गोदावरी नदीवरील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील तसेच प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील ६ हजार ३१४ लोखंडी फळ्यांवर गंज चढल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. लोखंडी फळ्या बदलण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर साडेपाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. दरम्यान जलसंपदा विभागाने साडेपाच कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. गोदावरी नदीवरील एकूण १२ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील लोखंडी फळ्या (बर्गे) गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वापरात आहेत. या बंधाºयात पूर्ण साठवण क्षमतेपर्यंत पाणी साठा होण्यासाठी ६ हजार १०४ लोखंडी फळ्या आवश्यक आहेत. सध्या फक्त ३ हजार ९६३ फळ्या चांगल्या स्थितीत आहेत. तर २ हजार १४१ फळ्या अत्यंत खराब झाल्या आहेत. त्यामुळे बंधाºयांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात अडचणी येत आहेत. या १२ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात पूर्ण साठवण क्षमतेपर्यंत पाणी साठा झाल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यासोबतच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे या गंजलेल्या फळ्या बदलून नवीन फळ्या खरेदी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी उपखोरे, गोदावरी कादवा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या १२ बंधाºयांच्या नादुरूस्त फळ्या काढून नवीन फळ्या बसविण्यासाठी विशेष दुरूस्ती अंतर्गत १ कोटी ८३ लाख ५२ हजार ६५२ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करुन हा निधी विभागाकडे देण्यात आला आहे. आश्वी, भेर्डापूर, चणेगाव, गळनिंब, मांडवे (पारनेर), कमालपूर, केसापूर, खानापूर, मालुंजे, मध्यमेश्वर प्रवरा, मांडवे (श्रीरामपूर),नांदूर खंदरमाळ, पाचेगाव, पढेगाव, पुनतगाव, रामपूर, वळदगाव, वांगी, देहरे या १९ बंधाºयांच्या दुरूस्तीसाठी ३ कोटी ५७ लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. पाचेगाव बंधाºयाच्या सर्वाधिक ५७५ फळ्या नादुरूस्त झाल्या आहेत.