शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

१५७ ग्रामपंचायतींच्या इमारती होणार चकाचक, शासनाकडून आता १०० टक्के निधी

By चंद्रकांत शेळके | Updated: December 11, 2023 21:18 IST

जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती इमारतीविना

अहमदनगर: गावचा कारभार हाकताना ग्रामपंचायतीला आपल्या कार्यालयासाठी प्रशस्त इमारत हवी असते. पूर्वी लहान ग्रामपंचायतींना निधीअभावी ही इमारत उभारताना अडचणी यायच्या. मात्र, आता राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मुदतवाढ दिल्याने, तसेच यात स्वनिधीची अट रद्द केल्याने या ग्रामपंचायतींना लवकरच चकाचक इमारत मिळणार आहे. जिल्ह्यात अद्याप १५७ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यांना हा फायदा होईल.

पूर्वी या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी, एक ते दोन हजार व दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य निर्धारित केले होते. तसेच १० ते २० टक्के एवढा निधी ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्याची तरतूद होती. बांधकाम मूल्य व स्वनिधीच्या अटीमुळे योजनेस अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे स्वनिधीची अट रद्द करण्यासह इमारत बांधकामास वाढीव अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.काय आहे बांधणी योजना?ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता बांधकामासाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

योजनेला मुदतवाढबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला पुढील चार वर्षे (२०२३-२४ ते २०२७-२८) मुदतवाढ देण्यात आली आहे.आधी किती मिळायचे अनुदान?पूर्वी या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी, एक ते दोन हजार व दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य शासनाने निर्धारित केले होते. त्यात १० ते २० टक्के म्हणजे दीड ते साडेतीन लाख एवढा निधी ग्रामपंचायतींना स्वनिधी म्हणून उपलब्ध करायचा होता.आता किती अनुदान मिळणार?२ हजारपेक्षा कमी लोकसंख्या - २० लाख रुपये२ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या - २५ लाख रुपयेजिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती इमारतीविनाजिल्ह्यातील एकूण १३२० ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींना इमारत नाही. यामुळे येथील ग्रामपंचायतींनी इमारत बांधकामासाठी शासनाकडे निधी मागितला आहे.शासनाने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने व यात निधीही वाढवल्याने या ग्रामपंचायतींना प्रशस्त ग्रामपंचायत इमारत मिळेल.- दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायत