शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

१५७ ग्रामपंचायतींच्या इमारती होणार चकाचक, शासनाकडून आता १०० टक्के निधी

By चंद्रकांत शेळके | Updated: December 11, 2023 21:18 IST

जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती इमारतीविना

अहमदनगर: गावचा कारभार हाकताना ग्रामपंचायतीला आपल्या कार्यालयासाठी प्रशस्त इमारत हवी असते. पूर्वी लहान ग्रामपंचायतींना निधीअभावी ही इमारत उभारताना अडचणी यायच्या. मात्र, आता राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मुदतवाढ दिल्याने, तसेच यात स्वनिधीची अट रद्द केल्याने या ग्रामपंचायतींना लवकरच चकाचक इमारत मिळणार आहे. जिल्ह्यात अद्याप १५७ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यांना हा फायदा होईल.

पूर्वी या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी, एक ते दोन हजार व दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य निर्धारित केले होते. तसेच १० ते २० टक्के एवढा निधी ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्याची तरतूद होती. बांधकाम मूल्य व स्वनिधीच्या अटीमुळे योजनेस अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे स्वनिधीची अट रद्द करण्यासह इमारत बांधकामास वाढीव अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.काय आहे बांधणी योजना?ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता बांधकामासाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

योजनेला मुदतवाढबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला पुढील चार वर्षे (२०२३-२४ ते २०२७-२८) मुदतवाढ देण्यात आली आहे.आधी किती मिळायचे अनुदान?पूर्वी या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी, एक ते दोन हजार व दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य शासनाने निर्धारित केले होते. त्यात १० ते २० टक्के म्हणजे दीड ते साडेतीन लाख एवढा निधी ग्रामपंचायतींना स्वनिधी म्हणून उपलब्ध करायचा होता.आता किती अनुदान मिळणार?२ हजारपेक्षा कमी लोकसंख्या - २० लाख रुपये२ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या - २५ लाख रुपयेजिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती इमारतीविनाजिल्ह्यातील एकूण १३२० ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींना इमारत नाही. यामुळे येथील ग्रामपंचायतींनी इमारत बांधकामासाठी शासनाकडे निधी मागितला आहे.शासनाने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने व यात निधीही वाढवल्याने या ग्रामपंचायतींना प्रशस्त ग्रामपंचायत इमारत मिळेल.- दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायत