शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

कूपनलिका उघड्याच

By admin | Updated: May 6, 2016 23:26 IST

अहमदनगर : पाणी नसलेल्या, बंद अवस्थेत असणाऱ्या, निकामी सरकारी व खासगी कूपनलिका बंद करण्याच्या आदेशाकडे ग्रामपंचायत पातळीवर दुर्लक्ष झालेले आहे.

अहमदनगर : पाणी नसलेल्या, बंद अवस्थेत असणाऱ्या, निकामी सरकारी व खासगी कूपनलिका बंद करण्याच्या आदेशाकडे ग्रामपंचायत पातळीवर दुर्लक्ष झालेले आहे. यासंदर्भात जिल्हा स्तरावरून आदेश देवूनही जिल्ह्यात त्यावर कार्यवाही नाही. विशेष म्हणजे प्रत्येक गावातील सरकारी कूपनलिकेची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. मात्र, खासगी कूपनलिका आकडेवारी कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नाही. अलीकडच्या काही वर्षात सर्वत्र बंद, निकामी कूपनलिकांमध्ये बालके पडण्याचे अपघात वाढलेले आहेत. फेबु्रवारी २०१६ मध्ये नेवासा तालुक्यातील चांदा गावात कूपनलिकेत बालक पडण्याची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या विषयावर गंभीर चर्चा होवून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बंद कूपनलिका बुजवण्याचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या सहीने गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. यात सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या खासगी व सरकारी कूपनलिका यांची पाहणी करून निकामी कूपनलिका बंद करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाने मे २००९ ला काढलेले आदेशात वापरात नसलेल्या कूपनलिका वाळू व दगड गोटे भरून त्यावर सिमेंट क्राँकिटने भरण्याची दक्षता संबंधित व मालक अथवा ठेकेदार यांनी घ्यावी, असे स्पष्ट आले होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झालेले आहे. जिल्हा परिषदेने फेबु्रवारी महिन्यांत काढलेले आदेशानंतर जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी गट विकास अधिकाऱ्यांकडून या विषयावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणत्या तालुक्यात किती निकामी कूपनलिका बुजवण्यात आल्या याचा अहवाल जि.प.ला अप्राप्त आहे.आढावा घेणारयासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुवेंद्र कदम यांच्याकडे विचारणा केली असता, फे बु्रवारी महिन्यांत याबाबतचे आदेश गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्यावर काय कार्यवाही झाली, याबाबतचा आढावा यांत्रिक विभागाकडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायमस्वरूपी बंद अथवा निरुपयोगी असणाऱ्या कूपनलिकेचे पुनर्भरण शक्य नाही. या कूपनलिकामध्ये झाडाच्या मुळ्या, हातपंपचा पाईप तुटून आडकून पडलेला असल्यास त्यांचे पुनर्भरण शक्य नाही. अशा परिस्थितीत या कूपनलिका बंद करणे योग्य ठरते, असे मत यांत्रिकी विभागाकडून नोंदवण्यात आले.