शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

कूपनलिका उघड्याच

By admin | Updated: May 6, 2016 23:26 IST

अहमदनगर : पाणी नसलेल्या, बंद अवस्थेत असणाऱ्या, निकामी सरकारी व खासगी कूपनलिका बंद करण्याच्या आदेशाकडे ग्रामपंचायत पातळीवर दुर्लक्ष झालेले आहे.

अहमदनगर : पाणी नसलेल्या, बंद अवस्थेत असणाऱ्या, निकामी सरकारी व खासगी कूपनलिका बंद करण्याच्या आदेशाकडे ग्रामपंचायत पातळीवर दुर्लक्ष झालेले आहे. यासंदर्भात जिल्हा स्तरावरून आदेश देवूनही जिल्ह्यात त्यावर कार्यवाही नाही. विशेष म्हणजे प्रत्येक गावातील सरकारी कूपनलिकेची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. मात्र, खासगी कूपनलिका आकडेवारी कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नाही. अलीकडच्या काही वर्षात सर्वत्र बंद, निकामी कूपनलिकांमध्ये बालके पडण्याचे अपघात वाढलेले आहेत. फेबु्रवारी २०१६ मध्ये नेवासा तालुक्यातील चांदा गावात कूपनलिकेत बालक पडण्याची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत या विषयावर गंभीर चर्चा होवून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बंद कूपनलिका बुजवण्याचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या सहीने गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. यात सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या खासगी व सरकारी कूपनलिका यांची पाहणी करून निकामी कूपनलिका बंद करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाने मे २००९ ला काढलेले आदेशात वापरात नसलेल्या कूपनलिका वाळू व दगड गोटे भरून त्यावर सिमेंट क्राँकिटने भरण्याची दक्षता संबंधित व मालक अथवा ठेकेदार यांनी घ्यावी, असे स्पष्ट आले होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झालेले आहे. जिल्हा परिषदेने फेबु्रवारी महिन्यांत काढलेले आदेशानंतर जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी गट विकास अधिकाऱ्यांकडून या विषयावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणत्या तालुक्यात किती निकामी कूपनलिका बुजवण्यात आल्या याचा अहवाल जि.प.ला अप्राप्त आहे.आढावा घेणारयासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुवेंद्र कदम यांच्याकडे विचारणा केली असता, फे बु्रवारी महिन्यांत याबाबतचे आदेश गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्यावर काय कार्यवाही झाली, याबाबतचा आढावा यांत्रिक विभागाकडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायमस्वरूपी बंद अथवा निरुपयोगी असणाऱ्या कूपनलिकेचे पुनर्भरण शक्य नाही. या कूपनलिकामध्ये झाडाच्या मुळ्या, हातपंपचा पाईप तुटून आडकून पडलेला असल्यास त्यांचे पुनर्भरण शक्य नाही. अशा परिस्थितीत या कूपनलिका बंद करणे योग्य ठरते, असे मत यांत्रिकी विभागाकडून नोंदवण्यात आले.