शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

लाचखोरीत नगर अव्वल

By admin | Updated: May 1, 2024 11:57 IST

अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने १ जानेवारी ते १९ मे २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६५ लाचखोर अधिकारी-कर्मचारी यांच्यावर

अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने १ जानेवारी ते १९ मे २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६५ लाचखोर अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सापळे लावून त्यांना अटक केली आहे. नाशिक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे. नाशिक विभागांतर्गत येत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात चार महिन्यांमध्ये १७ अधिकारी-कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात अडकले आहेत. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच ही आकडेवाडी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे हे पाच जिल्हे येतात.१ जानेवारी ते १९ मे या काळात लाच घेणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढला आहे. जशा तक्रारी आल्या तसेच सापळे रचले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १६, अहमदनगर जिल्ह्यात १७, नंदुरबार जिल्ह्यात ६, जळगाव जिल्ह्यात १५, धुळे जिल्ह्यात ११ सापळे लावण्यात आले होते. या सापळ््यामध्ये ६५ अधिकारी-कर्मचारी अटक करण्यात आले होते. नाशिक विभागात लाच घेणार्‍या अधिकार्‍यांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा वरचा क्रमांक आहे. राज्यात नाशिक विभाग लाच घेण्यात अव्वल ठरला आहे. यामध्ये मुंबई विभागात ३३, ठाणे विभागात ४८, पुणे विभागात ५८, नाशिक विभागात ६५, नागपूर विभागात ४६, अमरावती विभागात ३९,औरंगाबाद विभागात ६०, नांदेड विभागात ५१ अधिकारी-कर्मचारी लाचेच्या जाळ््यात अडकले आहेत. लाच घेण्याच्या तक्रारी येण्यामध्ये राज्यभरात ७८ टक्के वाढ झाली आहे. नाशिक विभागात लाचखोर अधिकार्‍यांवर रचलेल्या सापळ््यांचे प्रमाण ११० टक्के इतके झाले आहे. सापळा रचल्यानंतर लाचखोर अधिकार्‍यांच्या तपासाचे प्रमाण मात्र नगण्य आहे. चार महिन्यांमध्ये ६५ पैकी दोनच प्रकरणांचा आतापर्यंत तपास पूर्ण झाला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वत:हून सापळा रचू शकत नाही. तक्रार आली की सापळा लावला जातो. राज्यभरात लाचखोर अधिकार्‍यांची संपत्ती बाहेर काढल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबाबत सामान्य लोकांमध्ये विश्वास वाढला. त्यामुळेच लाचखोर अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत तक्रारी देण्याचा ओघ वाढला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून लोकांना तक्रारी करायच्या होत्या. मात्र राज्यभरात होत असलेल्या कारवायांमुळे लोकांमध्ये तक्रार करण्याचे धैर्य वाढले आहे. (प्रतिनिधी) गतवर्षीच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये लावलेल्या सापळ््यांमध्ये २२५ अधिकारी-कर्मचारी अडकले होते. तीच संख्या यंदा दुपटीने वाढली आहे. यंदा पहिल्या चार महिन्यांमध्येच सापळा लावलेल्या लाचखोर अधिकार्‍यांची संख्या ४०० पर्यंत गेली आहे. म्हणजे गतवर्षीपेक्षा लाचखोरांवर सापळा लावलेल्या कारवायांची संख्या दुपटीने वाढली आहे.