शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जिल्हा बँक भरतीत करारनाम्याचा भंग; जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल, देशमुखची नियुक्तीही संशयास्पद

By सुधीर लंके | Updated: January 12, 2021 12:17 IST

जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे कामकाज ‘नायबर’ या संस्थेला दिले होते. ‘नायबर’ने या कामकाजात गोपनीयता बाळगणे आवश्यक असतानाही त्यांनी बँकेच्या परस्पर अन्य संस्थेची मदत घेऊन भरतीचे कामकाज केले. याबाबत बँक स्तरावर काहीही करारनामा आढळून येत नाही, असा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी विभागीय सहनिबंधकांना पाठविला आहे.

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे कामकाज ‘नायबर’ या संस्थेला दिले होते. ‘नायबर’ने या कामकाजात गोपनीयता बाळगणे आवश्यक असतानाही त्यांनी बँकेच्या परस्पर अन्य संस्थेची मदत घेऊन भरतीचे कामकाज केले. याबाबत बँक स्तरावर काहीही करारनामा आढळून येत नाही, असा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी विभागीय सहनिबंधकांना पाठविला आहे.

जिल्हा सहकारी बँकेने ४६४ जागांसाठी २०१७ साली राबविलेली भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या एका आदेशाचा आधार घेत ही भरती नियमित करण्यात आली असली तरी भरतीबाबत काही गंभीर तक्रारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केलेल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर सहकार विभागाने सरकारीऐवजी खासगी एजन्सीमार्फत संशयास्पद उत्तरपत्रिका तपासून घोटाळा दडपला अशी टिळक यांची, तर नायबरने परस्पर अन्य एजन्सीची मदत घेऊन भरती प्रक्रिया राबविली असल्याने भरतीच्या मूलभूत करारनाम्याचाच भंग झाला आहे, अशी चंगेडे यांची तक्रार आहे.

चंगेडे यांच्या तक्रारीबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना दिला होता. त्यानुसार आहेर यांनी अहवाल सादर केला आहे. नायबरने बँकेच्या परस्पर वैश्विक मल्टिब्लेझ या संस्थेची मदत भरतीत घेतली. बँक याबाबत अनभिज्ञ आहे, ही बाब बँकेने या चौकशीतही मान्य केली आहे. ‘नायबर’ने परस्पर अन्य एजन्सी नियुुक्त करून भरतीचे कामकाज केले. हा गंभीर मुद्दा सहकार विभागाने औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनास आणला होता का? व हा मुद्दा निदर्शनास आणल्यानंतरही न्यायालयाने भरती वैध ठरविली असेल, तर सहकार विभागाने तातडीने फेरविचार याचिकेद्वारे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे चंगेडे यांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत आहेर यांनी आपल्या अहवालात मतप्रदर्शन केलेले नाही.

साध्या टपालाने नियुक्ती पत्रे पाठविण्याचा बँकेचा रिवाज असल्याने बँकेने याही भरतीत त्याच पद्धतीने उमेदवारांना नियुक्ती पत्रे पाठवली, असे बँकेने याही चौकशीत नमूद केले आहे. मात्र, या टपालांबाबत बँकेच्या स्तरावरही सविस्तर दप्तर आढळलेले नाही, असे आहेर यांनी अहवालात नमूद केले आहे.

अमोल देशमुख या अकोले तालुक्यातील उमेदवारास बँकेने नोकरीत हजर होण्यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली, तसेच बँकेच्या कार्यकारी समितीने या मुदतवाढीला मंजुरी दिल्याचेही चौकशीत पुढे आले आहे. या विशिष्ट उमेदवाराबाबत बँकेने मेहरनजर का दाखविली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमोल देशमुख मुलाखतीस पात्र नसताना मुलाखत घेतली या बाबीचा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी इन्कार केला. चौकशी अहवालात ही बाब नमूद असल्याचे निदर्शनास आणल्यानंतरही त्यांनी इन्कार केला.

अमोल देशमुख पात्र नसतानाही घेतली मुलाखत

बँकेने प्रथम श्रेणी अधिकारी पदावर अमोल रमेश देशमुख या उमेदवारास तब्बल एक वर्षानंतर नियुक्ती दिली असून, तो पात्र नसताना नियुक्ती दिली असा चंगेडे यांचा आक्षेप आहे. ‘आपणाकडे बँकिंग क्षेत्रातील पाच वर्षांच्या अनुभवाचे प्रमाणपत्र नसल्याने आपण मुलाखत देण्यास पात्र नाही’ असे या उमेदवाराने लेखी कळविले असतानाही बँकेने या उमेदवाराची मुलाखत घेतल्याची बाब चौकशीत निदर्शनास आली आहे. या उमेदवाराने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक व राहुरीच्या अभिनव सहकारी बँकेच्या अनुभवाचा दाखला मुलाखतीनंतर दाखल केलेला आहे. या दोन्ही बँकांकडे हा उमेदवार हजर झालेल्या दिनांकापासून त्याचा पगाराचा तपशील चौकशी समितीने मागितला. मात्र, पुणे बँकेने ही माहिती दिली नाही, तर अभिनव बँकेने हे दप्तर उपलब्ध नसल्याचे चौकशी समितीला कळविले आहे. देशमुख यांच्या अर्जातही अभिनव बँकेत काम केल्याचा उल्लेख आढळलेला नाही.

‘नायबर’ने परस्पर अन्य एजन्सी नियुक्त करून भरती प्रक्रिया राबविणे हाच गुन्हा आहे. मात्र, सहकार विभाग या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करून कागदी घोडे नाचवीत आहे. न्यायालयासमोर हा गंभीर मुद्दा सुनावणीत मांडला का, हा आपला प्रश्न आहे.

 - शशिकांत चंगेडे, माहिती अधिकार कार्यकर्ते

या भरतीत घोटाळा झाला हे स्पष्ट दिसत असतानाही सहकार आयुक्त त्याकडे दुुर्लक्ष करीत आहेत. आयुक्त अनिल कवडे व विभागीय सहनिबंधक कार्यालय वेळकाढूपणा करीत आहे.

  - टिळक भोस, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र