शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

नगरच्या कवयित्रीचा साहित्य संमेलनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:18 IST

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

श्रीरामपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळालेल्या पहिल्या तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप करीत बहिष्काराची घोषणा केली आहे.ज्येष्ठ साहित्यिकांवर अशी वेळ ओढवणार असेल तर आपणही संमेलनात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संमेलन ११ ते १३ जानेवारी या कालावधीत होत आहे. उद्घाटनाच्या भाषणाद्वारे मांडल्या जाणाºया संभाव्य भूमिकेवरूनच सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत कवयित्री दिशा शेख यांना संपर्क केला असता, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद व मोठी चिंता व्यक्त केली.शेख म्हणाल्या, सहगल यांचे भाषण माझ्या वाचनात आले. त्यात संमेलनाचे निमंत्रण नाकारण्यासारखे काहीही नाही. वादग्रस्त असा कुठलाही विचार त्या मांडणार नव्हत्या. सहगल यांची गांधी विचारांशी नाळ जोडलेली आहे.आपल्या आई-वडिलांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका आणि त्यातून त्यांची झालेली जडण-घडण असाच काहिसा त्या भाषणाचा संदर्भ होता. धर्म-जातीच्या नावावर सध्या सुरू असलेल्या राजकारणावरही त्या भाष्य करणारहोत्या.निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनास उपस्थित राहणार होते. अशा वेळी सहगल या गांधी-नेहरू यांच्या विचारांचे कौतुक करतील अशी शक्यता होती. विषय काहीही असो, मात्र एखाद्या साहित्यिकास उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर व त्याचे भाषण मागवल्यानंतर निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीर असल्याचे शेख यांनी सांगितले.एखाद्यास बोलण्यापासून थांबविणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. उद्या कदाचित माझ्या एखाद्या लिखाणावर कुणी असहमत असेल तर त्याचा अर्थ वागण्याची ही पद्धती नव्हे असे शेख यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर