शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नगरच्या कवयित्रीचा साहित्य संमेलनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:18 IST

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

श्रीरामपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळालेल्या पहिल्या तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप करीत बहिष्काराची घोषणा केली आहे.ज्येष्ठ साहित्यिकांवर अशी वेळ ओढवणार असेल तर आपणही संमेलनात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संमेलन ११ ते १३ जानेवारी या कालावधीत होत आहे. उद्घाटनाच्या भाषणाद्वारे मांडल्या जाणाºया संभाव्य भूमिकेवरूनच सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत कवयित्री दिशा शेख यांना संपर्क केला असता, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद व मोठी चिंता व्यक्त केली.शेख म्हणाल्या, सहगल यांचे भाषण माझ्या वाचनात आले. त्यात संमेलनाचे निमंत्रण नाकारण्यासारखे काहीही नाही. वादग्रस्त असा कुठलाही विचार त्या मांडणार नव्हत्या. सहगल यांची गांधी विचारांशी नाळ जोडलेली आहे.आपल्या आई-वडिलांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका आणि त्यातून त्यांची झालेली जडण-घडण असाच काहिसा त्या भाषणाचा संदर्भ होता. धर्म-जातीच्या नावावर सध्या सुरू असलेल्या राजकारणावरही त्या भाष्य करणारहोत्या.निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनास उपस्थित राहणार होते. अशा वेळी सहगल या गांधी-नेहरू यांच्या विचारांचे कौतुक करतील अशी शक्यता होती. विषय काहीही असो, मात्र एखाद्या साहित्यिकास उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर व त्याचे भाषण मागवल्यानंतर निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीर असल्याचे शेख यांनी सांगितले.एखाद्यास बोलण्यापासून थांबविणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. उद्या कदाचित माझ्या एखाद्या लिखाणावर कुणी असहमत असेल तर त्याचा अर्थ वागण्याची ही पद्धती नव्हे असे शेख यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर