शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नगरच्या कवयित्रीचा साहित्य संमेलनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:18 IST

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.

श्रीरामपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळालेल्या पहिल्या तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप करीत बहिष्काराची घोषणा केली आहे.ज्येष्ठ साहित्यिकांवर अशी वेळ ओढवणार असेल तर आपणही संमेलनात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संमेलन ११ ते १३ जानेवारी या कालावधीत होत आहे. उद्घाटनाच्या भाषणाद्वारे मांडल्या जाणाºया संभाव्य भूमिकेवरूनच सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत कवयित्री दिशा शेख यांना संपर्क केला असता, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद व मोठी चिंता व्यक्त केली.शेख म्हणाल्या, सहगल यांचे भाषण माझ्या वाचनात आले. त्यात संमेलनाचे निमंत्रण नाकारण्यासारखे काहीही नाही. वादग्रस्त असा कुठलाही विचार त्या मांडणार नव्हत्या. सहगल यांची गांधी विचारांशी नाळ जोडलेली आहे.आपल्या आई-वडिलांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका आणि त्यातून त्यांची झालेली जडण-घडण असाच काहिसा त्या भाषणाचा संदर्भ होता. धर्म-जातीच्या नावावर सध्या सुरू असलेल्या राजकारणावरही त्या भाष्य करणारहोत्या.निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनास उपस्थित राहणार होते. अशा वेळी सहगल या गांधी-नेहरू यांच्या विचारांचे कौतुक करतील अशी शक्यता होती. विषय काहीही असो, मात्र एखाद्या साहित्यिकास उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर व त्याचे भाषण मागवल्यानंतर निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीर असल्याचे शेख यांनी सांगितले.एखाद्यास बोलण्यापासून थांबविणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. उद्या कदाचित माझ्या एखाद्या लिखाणावर कुणी असहमत असेल तर त्याचा अर्थ वागण्याची ही पद्धती नव्हे असे शेख यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर