शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात मृत जनावरांची हाडे

By admin | Updated: March 19, 2016 00:09 IST

मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूर पिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो.

मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूरपिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो. नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे फाटा फुटतो़ तेथून संजयनगरकडे जाणाऱ्या साई रेल्वे भुयारी मार्गापर्यंत पाटाची स्थिती थोडी बरी आढळली़ पुढे सुखदा हौसिंग व अहिल्यादेवीनगरमध्ये पाण्याचा नाही तर कचऱ्याचाच पाट वाहतो़ या पाण्यात मृत जनावरांची हाडे, चिंध्या, केरकचरा अशी घाण वाहताना आढळून आली़ नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे जाणाऱ्या पाटाचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशन केले़ श्रीरामपूरला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या साठवण तलावात पाटाद्वारे पाणी सोडलेले आहे़ मात्र, या पाटातच मृत जनावरे, केर कचरा टाकला जात असल्याचे वास्तव या स्टींग आॅपरेशनमधून ‘लोकमत’ने उघडकीस आणले़ श्रीरामपूरकर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनची प्रक्रिया होऊन प्यायला मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रवास तुमचेही डोळे गरगरायला लावणारा आहे़ येत्या २ एप्रिलला निळवंडे धरणातून आवर्तन सुटणार आहे. प्रवरा डाव्या कालव्यातून येणाऱ्या आवर्तनाच्या पाण्याने श्रीरामपूर नगरपालिकेचा साठवण तलाव भरला जाणार आहे. या पाटाची पाहणी शुक्रवारी केली़ तेव्हा प्रवरा कालवा हा पाण्याचा पाट नाही तर कचऱ्याचा पाट झाल्याचं दिसलं़ या पाटामधूनच तलावात पाणी सोडलं जातं. संजयनगरकडे जाणाऱ्या साई भुयारी पुलापासून ते गोंधवणी रस्त्यावरील पुलापर्यंत पाटात चिंध्या, ओवळ्या-सोवळ्याचे कपडे, केरकचरा ठिकठिकाणी दिसत होता. इमॅन्युएल चर्चच्या परिसरात गोपीनाथनगर व संजयनगरच्या घरांमधील मोऱ्यांचे घाण पाणी, सांडपाणी व इतर सांडपाणीही थेट पाटात सोडण्यात आलंय. त्यासाठी चर्चजवळच रस्ता खोदून खास पाईप टाकून गोपीनाथनगरच्या घरांमधील घाण पाणी पाटात सोडलं आहे. या घाणीमुळे अहिल्यादेवीनगरमधील पाटाच्या कडेला राहणारे नागरिक डासांमुळे त्रस्त आहेत. या काही घरांमधीलही मोऱ्यांचं पाणीही पाटातच जातं. याच पाटातून पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात जातं़सहज वॉशिंग प्रोजेक्टसमोर ज्याठिकाणाहून पाटाचे पाणी साठवण तलावाकडे वळते, त्याजवळच मेलेलं जनावर पाटाच्या मधोमध पडलेलं. त्यावर कावळे तुटून पडले होते. प्रभाग २ मधील जलकुंभ भरणारी एक जलवाहिनी गोंधवणी-पुणतांबा रस्त्यावरील पुलाखालून जाणाऱ्या पाटातूनच जाते. या जलवाहिनीस कचरा, घाण पाण्याचा वेढा पडलेला आहे़ ही पाईपालईन फुटल्यास पाटातील ही घाण थेट पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरात पोहोचण्याचा धोका नाकारता येत नाही़