शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

पाण्यात मृत जनावरांची हाडे

By admin | Updated: March 19, 2016 00:09 IST

मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूर पिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो.

मिलींदकुमार साळवे, श्रीरामपूरपिण्याच्या पाण्याचा प्रवास प्रवरा डाव्या कालव्यातून श्रीरामपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावापर्यंत होतो. नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे फाटा फुटतो़ तेथून संजयनगरकडे जाणाऱ्या साई रेल्वे भुयारी मार्गापर्यंत पाटाची स्थिती थोडी बरी आढळली़ पुढे सुखदा हौसिंग व अहिल्यादेवीनगरमध्ये पाण्याचा नाही तर कचऱ्याचाच पाट वाहतो़ या पाण्यात मृत जनावरांची हाडे, चिंध्या, केरकचरा अशी घाण वाहताना आढळून आली़ नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावाकडे जाणाऱ्या पाटाचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींग आॅपरेशन केले़ श्रीरामपूरला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या साठवण तलावात पाटाद्वारे पाणी सोडलेले आहे़ मात्र, या पाटातच मृत जनावरे, केर कचरा टाकला जात असल्याचे वास्तव या स्टींग आॅपरेशनमधून ‘लोकमत’ने उघडकीस आणले़ श्रीरामपूरकर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनची प्रक्रिया होऊन प्यायला मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रवास तुमचेही डोळे गरगरायला लावणारा आहे़ येत्या २ एप्रिलला निळवंडे धरणातून आवर्तन सुटणार आहे. प्रवरा डाव्या कालव्यातून येणाऱ्या आवर्तनाच्या पाण्याने श्रीरामपूर नगरपालिकेचा साठवण तलाव भरला जाणार आहे. या पाटाची पाहणी शुक्रवारी केली़ तेव्हा प्रवरा कालवा हा पाण्याचा पाट नाही तर कचऱ्याचा पाट झाल्याचं दिसलं़ या पाटामधूनच तलावात पाणी सोडलं जातं. संजयनगरकडे जाणाऱ्या साई भुयारी पुलापासून ते गोंधवणी रस्त्यावरील पुलापर्यंत पाटात चिंध्या, ओवळ्या-सोवळ्याचे कपडे, केरकचरा ठिकठिकाणी दिसत होता. इमॅन्युएल चर्चच्या परिसरात गोपीनाथनगर व संजयनगरच्या घरांमधील मोऱ्यांचे घाण पाणी, सांडपाणी व इतर सांडपाणीही थेट पाटात सोडण्यात आलंय. त्यासाठी चर्चजवळच रस्ता खोदून खास पाईप टाकून गोपीनाथनगरच्या घरांमधील घाण पाणी पाटात सोडलं आहे. या घाणीमुळे अहिल्यादेवीनगरमधील पाटाच्या कडेला राहणारे नागरिक डासांमुळे त्रस्त आहेत. या काही घरांमधीलही मोऱ्यांचं पाणीही पाटातच जातं. याच पाटातून पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात जातं़सहज वॉशिंग प्रोजेक्टसमोर ज्याठिकाणाहून पाटाचे पाणी साठवण तलावाकडे वळते, त्याजवळच मेलेलं जनावर पाटाच्या मधोमध पडलेलं. त्यावर कावळे तुटून पडले होते. प्रभाग २ मधील जलकुंभ भरणारी एक जलवाहिनी गोंधवणी-पुणतांबा रस्त्यावरील पुलाखालून जाणाऱ्या पाटातूनच जाते. या जलवाहिनीस कचरा, घाण पाण्याचा वेढा पडलेला आहे़ ही पाईपालईन फुटल्यास पाटातील ही घाण थेट पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरात पोहोचण्याचा धोका नाकारता येत नाही़