शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

बॉम्बपेक्षाही विषमता स्फोटक

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

अत्याचारविरोधी परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन

अहमदनगर : राजकीय नेत्यांना लोकांची फक्त मत हवी आहेत. निवडणुकांचा प्रचार ज्या हायटेक पद्धतीने होतो, त्याचपद्धतीने अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेत नाहीत. देशात दहा कोटी म्हातारे आहेत, त्यांची काळजी कोण घेणार? विषमता वाढत राहिली तर जगायचे कसे? विषमता ही बॉम्बपेक्षाही स्फोटक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड बाबा आढाव यांनी केले. सामाजिक न्याय परिषदेतर्फे शनिवारी सहकार सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय अत्याचार विरोधी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड आढाव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत विद्याताई बाळ, अ‍ॅड. असिम सरोदे, सामाजिक न्याय परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, वाल्मिक निकाळजे, अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आढाव म्हणाले, जाती अंताची लढाई सुरू केली का? जात-धर्माबद्दल वैज्ञानिक सत्य नाही म्हणून हे विषय अभ्यासक्रमात कधीच आले नाहीत. राजकारणात जाती अंताचा निर्धार नाही. खर्‍या इतिहासाचे संशोधन नाही. सरकार बदलले असले तरी सनातनी व्यवस्था त्यांच्याकडे जात आहे. पुतळ््यांच्या उंचीची स्पर्धा लागली आहे. भावनिकेतवर जोर दिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांगायचा अजेंडा वेगळा आणि छुपा वेगळा आहे. केंद्रात बहुमताने सरकार आले असले तरी यामुळे धर्मनिरपेक्षता, समाजवाद नव्हे तर राज्यघटनाच धोक्यात आली आहेत. त्यांच्या वाट्याला सरकार आणि आमच्या वाट्याला फक्त खैरलांजी-खर्डा हेच आहेत का? असा सवाल आढाव यांनी केला. अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत म्हणून सरकारने अद्याप तरी काहीच केले नाही, असे सांगून आढाव यांनी मोदी सरकारवरही ताशेरे ओढले. विद्याताई बाळ म्हणाल्या, अत्याचाराच्या घटना जरी दुर्दैवी असल्या तरी महाराष्ट्रात नवी पहाट आली आहे. न्याय मिळवायचा असेल तर त्याची भिस्त तरुणांवर आहे. शरद पवार यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची सामाजिक संवेदना बोथट झाली आहे. सत्तेमध्ये मराठ्यांची मिजास आहे. केंद्रात हिंदुत्त्ववादी बहुमत आहे, त्यामुळे येथून पुढे मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. जाती अंताच्या लढ्यात सर्वांनाच सक्रीय व्हावे लागेल. वर्णव्यवस्था तर्कसंगत नाही. पुरुष आणि स्त्री यांनी हातात हात घालून घर व समाज चांगला राहील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलगी शिकते, मुले बेकार राहतात. यामधूनच अत्याचारासारखे प्रसंग घडतात, हे दुर्दैवी आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भानुदास गजभिव, वाल्मिक निकाळजे, बबनराव वडमारे, मीनाक्षी शिंदे, पंडित कांबळे, सिमांत तायडे यांची भाषणे झाली. अरुण खैरे यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)