शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या

By शेखर पानसरे | Updated: December 24, 2022 16:20 IST

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही

संगमनेर : शेतात माल पिकवणं शेतकऱ्याच्या हातात आहे, पण बाजारात विकणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही. त्यामुळेच, अनेकदा शेती मालाला भाव न मिळाल्याने बळीराजाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा लाल चिखल केल्याचं आपण पाहिलंय. काहींना बाजारात चक्क फुकट टमाटे वाटल्याचं दिसून दिसून आलंय. आता संगमनेर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने चक्क शेतात मेंढ्या-शेळ्या सोडल्या आहेत. हतबल झालेल्या या बळीराजाची करुण कहानी अनेकांचे डोळे पाणावणारीच आहे.  

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही. बाजार समितीमध्ये, बाजारात टोमॅटो विक्रीसाठी नेले असता घरातून पैसे घालण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याने संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी शशिकांत विठ्ठल कढणे यांनी त्यांच्या टोमॅटोच्या शेतात मेंढ्या आणि शेळ्या सोडल्या आहेत.         शेतकरी शशिकांत कढणे यांनी सांगितले की, टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो हे बाजार समिती, बाजारात विक्रीला नेण्यासाठी गाडीचे भाडे सुद्धा खिशातून घालण्याची वेळ आली आहे. टोमॅटो रोप, शेतीची मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजूरी, मंडप बांधण्यासाठी (बांधणी) लागणारी तार, बांबू, सुतळी आणि टोमॅटो काढणी अशा एकूण खर्चाचा विचार केला असता तो एकरी साधारण सव्वा लाख रुपये इतका होतोच. एवढा खर्च होऊनही सध्या बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी नेल्यानंतर हाती कोऱ्या पावत्यांचे शिवाय काहीही पडत नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरMarketबाजार