शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हाती कोऱ्याच पावत्या; बळीराजाने टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या अन् मेंढ्या

By शेखर पानसरे | Updated: December 24, 2022 16:20 IST

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही

संगमनेर : शेतात माल पिकवणं शेतकऱ्याच्या हातात आहे, पण बाजारात विकणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही. त्यामुळेच, अनेकदा शेती मालाला भाव न मिळाल्याने बळीराजाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा लाल चिखल केल्याचं आपण पाहिलंय. काहींना बाजारात चक्क फुकट टमाटे वाटल्याचं दिसून दिसून आलंय. आता संगमनेर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने चक्क शेतात मेंढ्या-शेळ्या सोडल्या आहेत. हतबल झालेल्या या बळीराजाची करुण कहानी अनेकांचे डोळे पाणावणारीच आहे.  

टोमॅटो पिकासाठी एकरी साधारण सव्वा लाख रूपये खर्च येतो. परंतू सध्या टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर हाती रुपयादेखील शिल्लक राहत नाही. बाजार समितीमध्ये, बाजारात टोमॅटो विक्रीसाठी नेले असता घरातून पैसे घालण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याने संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी शशिकांत विठ्ठल कढणे यांनी त्यांच्या टोमॅटोच्या शेतात मेंढ्या आणि शेळ्या सोडल्या आहेत.         शेतकरी शशिकांत कढणे यांनी सांगितले की, टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो हे बाजार समिती, बाजारात विक्रीला नेण्यासाठी गाडीचे भाडे सुद्धा खिशातून घालण्याची वेळ आली आहे. टोमॅटो रोप, शेतीची मशागत, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजूरी, मंडप बांधण्यासाठी (बांधणी) लागणारी तार, बांबू, सुतळी आणि टोमॅटो काढणी अशा एकूण खर्चाचा विचार केला असता तो एकरी साधारण सव्वा लाख रुपये इतका होतोच. एवढा खर्च होऊनही सध्या बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी नेल्यानंतर हाती कोऱ्या पावत्यांचे शिवाय काहीही पडत नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरMarketबाजार