शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ताकद वाढणार

By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय फाटाफुटीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. पक्षाच्या विद्यमान सदस्या,

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय फाटाफुटीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. पक्षाच्या विद्यमान सदस्या, त्यांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. यामुळे पुढील काळात जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाची ताकद वाढणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे तीन सदस्य आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या सदस्यांना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असून त्या ठिकाणी नव्याने पोट निवडणुका होणार आहेत.जिल्ह्यात अडीच वर्षापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादीने सर्वात चांगले यश मिळविले होते. जिल्हा परिषदेत ३२ सदस्यांसह राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर होती. अशी अवस्था पंचायत समिती सभापती पदाच्या बाबतीतही होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल़्ह्यातील राजकीय चित्र बदलेले आहे. पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात पाच आमदार भाजपाचे निवडून आले आहेत. कोपरगावात राष्ट्रवादीतून स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या असून त्यांचे तीन समर्थक सदस्य आहे. पाथर्डीतून मोनिका राजळे विजयी झाल्या असून त्यांच्याकडे दोन समर्थक सदस्य आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले वांबोरी गटातील सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. नेवाशातील काँग्रेसच्या सदस्या आशा मुरकुटे यांचे पती भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. अकोल्यातील सदस्या सुनीता भांगरे यांचे पती अशोक भांगरे यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात होते. पारनेरात सेनेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे भाजपाचे उमेदवार होते. संगमनेरात राष्ट्रवादीच्या सदस्या ललिता आहेर यांचे पती जनार्दन आहेर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली. या सदस्या अथवा त्यांचे नातेवाईक जरी तांत्रिकदृष्ट्या त्या त्या पक्षात आले, तरी त्यांनी पक्ष विरोधीकृती केलेली आहे. काहींनी विरोधी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे. यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होते, याकडे जिल्हा परिषदेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे कागदावर ३२ सदस्य दिसत असले तरी १० सदस्य विधानसभा निवडणुकीत वेगळ्या भूमिकेत होते. तर काँग्रेसचे ३ आणि सेनेच्या २ सदस्यांनी पक्षाच्या विरोधी काम केले. या सदस्यांवर कारवाई झाली नाही, पुढील अडीच वर्षासाठी या ठिकाणी भाजपाचे वर्चस्व राहणार असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. (प्रतिनिधी)