शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

भाजपाच्या राज्यात भाजपाचेच आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:55 IST

शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. 

ठळक मुद्देअहमदनगर शहर भाजपाचे शुक्रवारी महावितरणच्या अभियंत्याना निवेदनसत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नसल्याची भाजपा पदाधिका-यांची भुमिका 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. 

उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपाने शुक्रवारी सकाळी महावितरण कार्यालयात अभियंता बोरसे यांना निवेदन दिले. सत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नाही. मात्र, जनतेच्या भावना आणि मागण्या आम्हाला मांडाव्याच लागतील, अशी भूमिकाही भाजप पदाधिका-यांनी घेतली. 

भारनियमनमुळे वसंत टेकडी येथील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.  इतर जिल्ह्यात २ ते ३ तास तर नगरमध्ये ८ तास भारनियमन का? असा सवाल यावेळी करण्यात आला.  महावितरणकडून नियोजन नसल्याचा आरोप सुवेंद्र गांधी यांनी केला.  एकीकडे पंतप्रधान प्रत्येक घराघरात वीज पोहोचवण्यासाठी आग्रही असतांना दुसरीकडे भारनियमन सुरू असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर देणार? अशा शब्दांत नरेंद्र कुलकर्णी यांनी व्यथा मांडल्या. दरम्यान, अधिक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी भारनियमनामागील भूमिका स्पष्ट केली. गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने विजेचा तुटवडा भासत आहे. आणखी दोन दिवस अडचणीचा सामना करावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीसाठी शहरात भारनियमन रद्द करणार असल्याचे आश्वासन बोरसे यांनी दिले.

 यावेळी भाजपाचे प्रशांत मुथा, सागर गोरे, रोहन डागवाले, मंगेश निसळ, मिलिंद भालसिंग, राहुल रासकर, भरत ठुबे, नितीन जोशी, आलीस सय्यद, अविनाश सकला, अभिषेक दायमा, सागर कारले, अज्जू शेख, संदीप ढाकणे, सजित खरमाळे, रोषण गांधी, नरेश चव्हाण उपस्थित होते. 

  • बावनकुळेंचे आश्वासन ?
  • आंदोलनावेळी सुवेंद्र गांधी यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बावनकुळे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर बावनकुळे यांनी गांधी यांना संपर्क करुन लवकरच भारनियमन बंद केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.