शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राज्यात भाजपाचेच आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:55 IST

शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. 

ठळक मुद्देअहमदनगर शहर भाजपाचे शुक्रवारी महावितरणच्या अभियंत्याना निवेदनसत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नसल्याची भाजपा पदाधिका-यांची भुमिका 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. 

उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपाने शुक्रवारी सकाळी महावितरण कार्यालयात अभियंता बोरसे यांना निवेदन दिले. सत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नाही. मात्र, जनतेच्या भावना आणि मागण्या आम्हाला मांडाव्याच लागतील, अशी भूमिकाही भाजप पदाधिका-यांनी घेतली. 

भारनियमनमुळे वसंत टेकडी येथील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.  इतर जिल्ह्यात २ ते ३ तास तर नगरमध्ये ८ तास भारनियमन का? असा सवाल यावेळी करण्यात आला.  महावितरणकडून नियोजन नसल्याचा आरोप सुवेंद्र गांधी यांनी केला.  एकीकडे पंतप्रधान प्रत्येक घराघरात वीज पोहोचवण्यासाठी आग्रही असतांना दुसरीकडे भारनियमन सुरू असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर देणार? अशा शब्दांत नरेंद्र कुलकर्णी यांनी व्यथा मांडल्या. दरम्यान, अधिक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी भारनियमनामागील भूमिका स्पष्ट केली. गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने विजेचा तुटवडा भासत आहे. आणखी दोन दिवस अडचणीचा सामना करावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीसाठी शहरात भारनियमन रद्द करणार असल्याचे आश्वासन बोरसे यांनी दिले.

 यावेळी भाजपाचे प्रशांत मुथा, सागर गोरे, रोहन डागवाले, मंगेश निसळ, मिलिंद भालसिंग, राहुल रासकर, भरत ठुबे, नितीन जोशी, आलीस सय्यद, अविनाश सकला, अभिषेक दायमा, सागर कारले, अज्जू शेख, संदीप ढाकणे, सजित खरमाळे, रोषण गांधी, नरेश चव्हाण उपस्थित होते. 

  • बावनकुळेंचे आश्वासन ?
  • आंदोलनावेळी सुवेंद्र गांधी यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बावनकुळे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर बावनकुळे यांनी गांधी यांना संपर्क करुन लवकरच भारनियमन बंद केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.