श्रीगोंदा : भाजपाने तिकीट दिले तर ठिक अन्यथा अपक्ष उमेदवारी करू. परंतु आता थांबायचे नाही, थेट भिडायचे अशी भूमिका कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी जाहीर केली. यामुळे जगताप समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांना आमदारकीने तीन वेळा हुलकावणी दिली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र नागवडे यांना साथ केली. माझे आमदारकीचे स्वप्न अपूर्ण राहिले. यापुढे विधानसभा निवडणुकीत नायक अथवा खलनायक न होता दिग्दर्शक होणार असल्याचे कुंडलिकराव जगताप यांनी जाहीर केले.राहुल जगताप यांना कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष केल्याने त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. राहुलने ज्येष्ठांचा आदर आणि युवकांशी मैत्री करीत स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करत असताना कुकडी कारखान्याचा कारभार जबाबदारीने केला. आर. के. ग्रुपच्या माध्यमातून तरुणांचे संघटन करताना खेळाडू, विद्यार्थी, रुग्णांसाठी मदतीसाठी हात मोकळा ठेवला. स्वबळावर कोळगाव जि.प. गटातील अटीतटीची निवडणूक जिंकली. अडीच वर्षात कोळगाव गटात सुमारे चार कोटीची विकास कामे केली.विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागताच तरुणांचा चेहरा असलेले राहुल जगताप यांचे नाव विधानसभेसाठी पुढे आले. भाजपाचे तिकीट मिळावे म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे.राहुल जगताप यांनी मात्र मतदार संघ पिंजून काढत आघाडी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)
भाजपाचे तिकीट अन्यथा अपक्ष उमेदवारी करणार
By admin | Updated: August 2, 2014 00:48 IST