शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:02 IST

भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़

अहमदनगर : भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़ त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, यासाठी सेना पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले़महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची शनिवारी हत्या झाली. या घटनेने विभागात एकच खळबळ उडाली़ पोटनिवडणुकीत अशा प्रकारे हिंसाचार होणे व त्यात कार्यकर्त्याचा मृत्यू होणे ही बाब गंभीर असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे़ त्यात या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री दिवाकर रावते व मंत्री कदम रविवारी नगरमध्ये आले होते़ शिवसैनिकांच्या हत्याकांडाला कदम यांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले़ ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला़ त्यानंतर कार्यकर्ते जगताप यांना घेऊन गेले़ यावरून नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची कल्पना येते़ कार्यालयावर हल्ला करणाºयांना मोक्का लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कदम म्हणाले़पोलिसांच्या मदतीने नगर शहरात गुंडगिरी वाढली असून, यातूनच शिवसैनिकांची हत्या झाली आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी़ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत़ मयतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना स्वीकारत असल्याचे कदम यांनी जाहीर केले़>भाजपाला शिवसेनेचा टेकूगृहराज्यमंत्रिपद सेनेकडे असल्याचे पत्रकारांनी छेडले असता, गृहराज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात ते सर्वांनाच माहिती आहे़ सेना सत्तेत सहभागी नसून, सेनेने फक्त टेकू दिलेला आहे़ गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे़ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे़ त्यास मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत़ या घटनेचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला जाईल, त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील, असेही कदम म्हणाले़>राष्ट्रवादीला बदनामकरण्याचे षड्यंत्र - पवारकोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अहमदनगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्यांची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हेन उलगडणारे कोडे आहे, असे सातारा येथे राष्टÑवादीच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी सांगितले.