शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:02 IST

भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़

अहमदनगर : भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़ त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, यासाठी सेना पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले़महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची शनिवारी हत्या झाली. या घटनेने विभागात एकच खळबळ उडाली़ पोटनिवडणुकीत अशा प्रकारे हिंसाचार होणे व त्यात कार्यकर्त्याचा मृत्यू होणे ही बाब गंभीर असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे़ त्यात या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री दिवाकर रावते व मंत्री कदम रविवारी नगरमध्ये आले होते़ शिवसैनिकांच्या हत्याकांडाला कदम यांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले़ ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला़ त्यानंतर कार्यकर्ते जगताप यांना घेऊन गेले़ यावरून नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची कल्पना येते़ कार्यालयावर हल्ला करणाºयांना मोक्का लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कदम म्हणाले़पोलिसांच्या मदतीने नगर शहरात गुंडगिरी वाढली असून, यातूनच शिवसैनिकांची हत्या झाली आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी़ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत़ मयतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना स्वीकारत असल्याचे कदम यांनी जाहीर केले़>भाजपाला शिवसेनेचा टेकूगृहराज्यमंत्रिपद सेनेकडे असल्याचे पत्रकारांनी छेडले असता, गृहराज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात ते सर्वांनाच माहिती आहे़ सेना सत्तेत सहभागी नसून, सेनेने फक्त टेकू दिलेला आहे़ गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे़ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे़ त्यास मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत़ या घटनेचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला जाईल, त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील, असेही कदम म्हणाले़>राष्ट्रवादीला बदनामकरण्याचे षड्यंत्र - पवारकोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अहमदनगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्यांची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हेन उलगडणारे कोडे आहे, असे सातारा येथे राष्टÑवादीच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी सांगितले.