शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नगर उड्डानपुलाच्या कामाचा भाजपने खेळ चालवलाय - सत्यजीत तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:02 IST

नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते.

अहमदनगर : नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन करण्याचा विसर भाजपला पडला असून, त्यांची फक्त श्रेय घेण्यासाठी खटाटोप सुरु आहे़ नगरकरांसाठी अस्मिता ठरलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा सध्याच्या सरकारने खेळ चालविला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.तांबे यांनी याबाबत शनिवारी पत्रकार परिषद घेतली़ तांबे म्हणाले, नगरच्या विकासासाठी हा उड्डाणपूल मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रसिद्धीपेक्षा काम होणे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला़ अनेकांच्या भेटीगाठी केल्या आहेत. मात्र भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी आज १४ आॅक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र, आज उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. भूमिपूजनही झालेले नाही़ त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्याअगोदरच उद्घाटनाची हवा करणे म्हणजे भाजपाचा पोरकटपणा आहे, अशी टीका तांबे यांनी केली़उड्डाणपुलाच्या कामाची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात आहे. यासाठी डीटीआर रिपोर्ट नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कामाची कोणतीही वर्कआॅर्डर नाही. खरे तर शासनाच्या नव्या नियमानुसार काम पूर्ण झाले असल्याचा दाखला असल्याशिवाय उद्घाटन ही करता येत नाही, असेही सांगत तांबे म्हणाले.

टॅग्स :ahmednagar overbrigeअहमदनगर उड्डाणपूलAhmednagarअहमदनगर