शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

जैविक बदलाचा वाद पेटला

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या मक्याच्या जनुकीय विकसित चाचणीवरून शेतकरी संघटना व जीएम अभियान आमनेसामने आल्याने घोषणायुद्ध रंगले.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या मक्याच्या जनुकीय विकसित चाचणीवरून शेतकरी संघटना व जीएम अभियान आमनेसामने आल्याने घोषणायुद्ध रंगले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर रोखल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा विभागाला धारेवर धरत दोन तास ठिय्या आंदोलन केले़जीएम अभियानाचे कार्यकर्ते गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून आले होते.ते हातात घोषणेचे फलक घेऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जमा झाले़ ‘अपना बीज अपना राज’,‘ बीज आमच्या हक्काचे नाही कंपनीच्या मालकीचे’, ‘जीएम बीज धोका है, देश बचाने का मोका है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला़ भारत अभियानच्या कार्यकर्त्यांनी सहयोगी संशोधक व अन्य शास्त्रज्ञांची भेट घेऊन निवेदन दिले़ त्यानंतर प्रांगणात सभा सुरू झाली़राज्याच्या विविध भागांतून जमा झालेले शेतकरी प्रवेशव्दाराजवळ आल्यानंतर त्यांना अडविण्यात आले़ सुरक्षारक्षकांनी कार्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव केला़ संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी औषध-बियाणांच्या शहरी दलालांना प्रवेश देता, मग आम्ही काय घोडे मारले, असा सवाल उपस्थित केला़ बीटी वाणामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पाचरट जाऊन सुबत्ता आली आहे, असे मत त्यांनी मांडले़ बियाणे चाचणी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या़ त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोघांना विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यास संमती दिली़भारत अभियानाच्या कविता कुरूंगटवार यांनी बीटी बियाणे प्रसाराला विरोध करीत पशु व मानवाच्या सुरक्षिततेसाठी चाचणीला विरोध केला़ परवानगी नसताना संशोधन क से केले जाते, आम्ही विद्यापीठाशी चर्चा केली असून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुभाष लोमटे, सुहास कोळेकसे, कुमार शिराळकर, कपिल शहा, अश्विन परांजपे यांनी दिला़ शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता भाषणे आटोपती घेत अभियानाच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रामभाऊ श्ािंदे, अनिल भुजबळ, गजानन भांडवले, गोविंद जोशी, संजय कोल्हे, प्रकाश पाटील, कैलास तवात, अनिल घनवट, अर्जुन बोऱ्हाडे, अनिल चव्हाण, जयश्री पाटील यांनी मक्याची चाचणी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली़ (तालुका प्रतिनिधी)