शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

जैविक बदलाचा वाद पेटला

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या मक्याच्या जनुकीय विकसित चाचणीवरून शेतकरी संघटना व जीएम अभियान आमनेसामने आल्याने घोषणायुद्ध रंगले.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या मक्याच्या जनुकीय विकसित चाचणीवरून शेतकरी संघटना व जीएम अभियान आमनेसामने आल्याने घोषणायुद्ध रंगले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर रोखल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा विभागाला धारेवर धरत दोन तास ठिय्या आंदोलन केले़जीएम अभियानाचे कार्यकर्ते गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून आले होते.ते हातात घोषणेचे फलक घेऊन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जमा झाले़ ‘अपना बीज अपना राज’,‘ बीज आमच्या हक्काचे नाही कंपनीच्या मालकीचे’, ‘जीएम बीज धोका है, देश बचाने का मोका है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला़ भारत अभियानच्या कार्यकर्त्यांनी सहयोगी संशोधक व अन्य शास्त्रज्ञांची भेट घेऊन निवेदन दिले़ त्यानंतर प्रांगणात सभा सुरू झाली़राज्याच्या विविध भागांतून जमा झालेले शेतकरी प्रवेशव्दाराजवळ आल्यानंतर त्यांना अडविण्यात आले़ सुरक्षारक्षकांनी कार्यालयात प्रवेश करण्यास मज्जाव केला़ संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी औषध-बियाणांच्या शहरी दलालांना प्रवेश देता, मग आम्ही काय घोडे मारले, असा सवाल उपस्थित केला़ बीटी वाणामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पाचरट जाऊन सुबत्ता आली आहे, असे मत त्यांनी मांडले़ बियाणे चाचणी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या़ त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोघांना विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यास संमती दिली़भारत अभियानाच्या कविता कुरूंगटवार यांनी बीटी बियाणे प्रसाराला विरोध करीत पशु व मानवाच्या सुरक्षिततेसाठी चाचणीला विरोध केला़ परवानगी नसताना संशोधन क से केले जाते, आम्ही विद्यापीठाशी चर्चा केली असून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुभाष लोमटे, सुहास कोळेकसे, कुमार शिराळकर, कपिल शहा, अश्विन परांजपे यांनी दिला़ शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता भाषणे आटोपती घेत अभियानाच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रामभाऊ श्ािंदे, अनिल भुजबळ, गजानन भांडवले, गोविंद जोशी, संजय कोल्हे, प्रकाश पाटील, कैलास तवात, अनिल घनवट, अर्जुन बोऱ्हाडे, अनिल चव्हाण, जयश्री पाटील यांनी मक्याची चाचणी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली़ (तालुका प्रतिनिधी)