शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांदा साठवणुकीवर कोट्यवधींचा सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

कांदा गेल्या काही वर्षांपासून आयात निर्यात धोरणात आल्याने बाजारभावाची अनिश्चितता व अचानक पन्नास ते शंभर रुपये किलोचे भाव येत ...

कांदा गेल्या काही वर्षांपासून आयात निर्यात धोरणात आल्याने बाजारभावाची अनिश्चितता व अचानक पन्नास ते शंभर रुपये किलोचे भाव येत असल्याने अनेक शेती व कृषी व्यापाराशी संबंधित पैसेवाले तयार झाले. यंदा मोठ्या भाववाढीच्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात कांदा खरेदी केली.

भारतात दरवर्षी १२ लाख हेक्टरवर, तर महाराष्ट्रात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होते, तर नगर जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर कांदा उत्पादन होते. यंदा भात क्षेत्र असलेल्या अकोलेत विक्रमी २८०० हेक्टरवर कांदा लागवड झाली; मात्र यातील ८० टक्के कांदा साठवणुकीसाठी कुलूप बंद झाला आहे.

महाराष्ट्र राज्याची कांदा साठवण क्षमता १४ लाख टन इतकी आहे; मात्र हे प्रमाण यंदा वीस टक्के वाढले. भाववाढ व जुलै ऑगस्ट महिन्यांत दुप्पट होतात, या अंदाजावर कांदा व्यापाऱ्याबरोबरीने विविध विभागांतील शासकीय नोकर, अकृषक व्यापारी, राजकीय नेते, किराणा, कापड, बांधकाम, ॲटोमोबाईल्स, कटलरी अशा व्यावसायिकांनी कांदा खरेदी करून तो साठविला आहे. काही शेतकऱ्यांनी उसनवार, कर्ज, घरातील दागिने गहाण ठेवून घरच्या कांद्याबरोबर बाहेरून आणून साठविला आहे.

विशेष म्हणजे यासाठी काहींनी हा कायमचा धंदा म्हणून मोठी गोडावून उभारली, तर काहींनी छोट्या चाळी उभारल्या. काहींनी भाड्याच्या चाळी, जुन्या इमारती, गोठे भाडे तत्त्वावर घेतले. त्यामुळे फेब्रुवारी ते जून दरम्यान कांदाचाळीचे साहित्याची तीस टक्के जादा दराने विक्री झाली.

मार्च ते मेअखेर ही खरेदी दहा ते पंधरा रुपये किलो दराने झाली. अनेकांनी पर जिल्ह्यातील माल मध्यस्थांमार्फत खरेदी केला आहे. सध्या दररोज हे गुंतवणूकदार ऑनलाईन कांदा बाजारभाव शेअर बाजाराप्रमाणे पाहतात, तर जाणकारांच्या सल्ल्यानुसार माल विकायचा निर्णय घेतात.

केंद्र सरकारने केवळ पॅनकार्डवर शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करण्याचे धोरण अवलंबले. शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्त मिळत असले तरी याचाच फायदा घेत अनेक सरकारी बाबू आपली नोकरी विसरून या धंद्यात उतरले. मात्र, साठवणूक, दरवाढीने तुटवडा निर्माण झाल्यास अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्रालय अतिरिक्त साठेबाजांवर नजर ठेवेल का? तर स्थानिक ठिकाणी पणन विभाग काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यातच आहे.

...............

कांदा व्यापारात आम्ही चाळीस वर्षे काम करतो. यंदा कांदा व्यापाराशी संबंधित नसलेल्यांनी मोठ्या प्रमाणात साठवणुकीसाठी पैसे लावले. परंतु, कोणता कांदा साठवायचा हे माहिती नसल्याने चाळी सडू लागल्या. पुढील पंधरा दिवसांत या चाळी व शेतकरी चाळीतला माल बाजारात येईल. बाजारभाव पावसाच्या स्थितीवर अवलंबून असतात.

-नितीन देशमुख, कांदा व्यापारी.