शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

बीजमातेने जिद्दीने पुन्हा उभारला बियाण्यांचा मळा, अतिवृष्टीने डगमगल्या नाहीत राहीबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 09:45 IST

Bijmata Rahibai Papore: माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण  शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- प्रकाश महालेराजूर (जि. अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे माझ्या बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मीही गावरान भाजीपाला पिकांची दोनदा लागवड केली; पण हातात काहीच आले नाही. हिंमत न सोडता, माझ्या शेतकऱ्यांना दर्जेदार गावरान भाजीपाला पिकांचे बियाणे मिळावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी आपण  शेतात तिसऱ्यांदा वेलवर्गीय भाजीपाल्याची बाग फुलवली असल्याचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.चालू खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टीने पिकांना फटका बसला आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनाही भाजीपाला पिकांची लागवड त्यांना तब्बल तीन वेळेला करावी लागली. या काळात त्यांनी घरात होते नव्हते हे सर्व बियाणे शेतात पेरले. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा फटका यंदा त्यांच्या शेतीलाही बसला. जिद्द आणि कष्टाळू राहीबाईंनी निसर्गापुढे हार मानली नाही. संधी मिळताच भाजीपाला पिकांच्या लागवडी त्या करत राहिल्या. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही, अशीच काहीशी परिस्थिती होती. मात्र, निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत, पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. कारली, दोडका, घोसाळी, वाल,  चंदन बटवा, मिरची,  टोमॅटो,  वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज इत्यादी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर