शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भूमिपुत्र शेतकरी संघटना करणार मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 18:43 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांची फसवणूक व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने

पारनेर : दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा करणा-या सरकारकडून अद्याप शेतक-यांचे कर्म माफ करण्यात आलेले नाही. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत़ त्यामुळे सरकारविरोधात बलिप्रतिपदेच्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.संघटनेने म्हटले आहे, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात हजारो शेतक-यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापही शेतक-यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे व हजारो शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी १ जून रोजी ऐतिहासिक शेतकरी संप करून राज्यसरकारकडे सरसकट कर्जमाफीची व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने शेतकरी संपाची दखल घेत शेतक-यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करुन दिवाळीपूर्वी सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे जाहीर केले होते. तथापि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांची फसवणूक व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना बलिप्रतिपदेच्या औचित्यावर बळीराजाची मिरवणूक काढून पारनेर पोलीस ठाण्यात सरकारवर गुन्हा दाखल करणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस