शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बालमटाकळीच्या भूमीपुत्राने उभारला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी ...

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. यासाठी लागणाऱ्या उसासाठी परिसरातील अल्पभूधारक ऊस उत्पादकांना प्राधान्य दिले जाणार असल्याने हा प्रकल्प सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.

बालमटाकळीचे भूमीपुत्र मयूर रंगनाथ वैद्य (वय ३६) यांनी गावातच शेवगाव-गेवराई मार्गालगत गट नंबर २०७ मध्ये जवळपास दोन एकर क्षेत्रामध्ये शिवरंग ॲग्रो नावाने सेंद्रिय गूळ निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात ३ मीलमधून ऊस गाळप केल्यानंतर रस उकळून गूळ बनवण्यासाठी ५ स्वतंत्र अत्याधुनिक कढई आहेत. १८ ते २० मजूर याठिकाणी मशिनरी हाताळणी, पॅकिंग, सफाई आदी कामे सांभाळतात. रसायन विरहित गूळ निर्मितीसाठी केवळ भेंडी पावडर, चुना आदीचा वापर केला जातो.

यामुळे आरोग्यासाठी हितकारक असा नैसर्गिक गूळ याठिकाणी तयार होत असल्याचे दिसते. येथे गुळासोबतच गूळ पावडर, काकवी आदी तयार करण्यात येते. तसेच उसाची चोथरी, धूर, राख, मळी आदी टाकाऊ घटकांचा पुन्हा वापर केला जात आहे. या प्रकल्पाची प्रति दिन जवळपास २०० टन ऊस गाळप क्षमता असून याद्वारे दररोज २० ते २२ टन गूळ उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

सद्या ३ कढईतून गूळनिर्मिती सुरू असून तयार होणारा गूळ मुंबई, पुणे, जळगाव आदी जिल्ह्यात वितरित होत आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाची गरज भासणार आहे. साधारणपणे मासिक ३ हजार टन उसाद्वारे ३०० टन गुळाचे उत्पादन होऊन ७० ते ८० लाखांची उलाढाल अपेक्षित असल्याचे मयूर वैद्य यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी त्यांना वडील रंगनाथ वैद्य, नितीन तुपे आदींचे सहकार्य लाभले.

----------

मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांकडून सहज नेला जातो. परंतु, अल्पभूधारक ऊस उत्पादकांची अडचण होते. परिसरातील अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करू शकलो याचा अभिमान वाटतो.

-मयूर रंगनाथ वैद्य,

अध्यक्ष, शिवरंग उद्योग समूह

फोटो ओळी ०७ बालमटाकळी

बालमटाकळी येथे शिवरंग उद्योग समूहाचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य यांनी उभारलेला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प.