शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

बालमटाकळीच्या भूमीपुत्राने उभारला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी ...

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. यासाठी लागणाऱ्या उसासाठी परिसरातील अल्पभूधारक ऊस उत्पादकांना प्राधान्य दिले जाणार असल्याने हा प्रकल्प सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.

बालमटाकळीचे भूमीपुत्र मयूर रंगनाथ वैद्य (वय ३६) यांनी गावातच शेवगाव-गेवराई मार्गालगत गट नंबर २०७ मध्ये जवळपास दोन एकर क्षेत्रामध्ये शिवरंग ॲग्रो नावाने सेंद्रिय गूळ निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात ३ मीलमधून ऊस गाळप केल्यानंतर रस उकळून गूळ बनवण्यासाठी ५ स्वतंत्र अत्याधुनिक कढई आहेत. १८ ते २० मजूर याठिकाणी मशिनरी हाताळणी, पॅकिंग, सफाई आदी कामे सांभाळतात. रसायन विरहित गूळ निर्मितीसाठी केवळ भेंडी पावडर, चुना आदीचा वापर केला जातो.

यामुळे आरोग्यासाठी हितकारक असा नैसर्गिक गूळ याठिकाणी तयार होत असल्याचे दिसते. येथे गुळासोबतच गूळ पावडर, काकवी आदी तयार करण्यात येते. तसेच उसाची चोथरी, धूर, राख, मळी आदी टाकाऊ घटकांचा पुन्हा वापर केला जात आहे. या प्रकल्पाची प्रति दिन जवळपास २०० टन ऊस गाळप क्षमता असून याद्वारे दररोज २० ते २२ टन गूळ उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

सद्या ३ कढईतून गूळनिर्मिती सुरू असून तयार होणारा गूळ मुंबई, पुणे, जळगाव आदी जिल्ह्यात वितरित होत आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाची गरज भासणार आहे. साधारणपणे मासिक ३ हजार टन उसाद्वारे ३०० टन गुळाचे उत्पादन होऊन ७० ते ८० लाखांची उलाढाल अपेक्षित असल्याचे मयूर वैद्य यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी त्यांना वडील रंगनाथ वैद्य, नितीन तुपे आदींचे सहकार्य लाभले.

----------

मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांकडून सहज नेला जातो. परंतु, अल्पभूधारक ऊस उत्पादकांची अडचण होते. परिसरातील अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करू शकलो याचा अभिमान वाटतो.

-मयूर रंगनाथ वैद्य,

अध्यक्ष, शिवरंग उद्योग समूह

फोटो ओळी ०७ बालमटाकळी

बालमटाकळी येथे शिवरंग उद्योग समूहाचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य यांनी उभारलेला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प.