शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बालमटाकळीच्या भूमीपुत्राने उभारला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी ...

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. यासाठी लागणाऱ्या उसासाठी परिसरातील अल्पभूधारक ऊस उत्पादकांना प्राधान्य दिले जाणार असल्याने हा प्रकल्प सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.

बालमटाकळीचे भूमीपुत्र मयूर रंगनाथ वैद्य (वय ३६) यांनी गावातच शेवगाव-गेवराई मार्गालगत गट नंबर २०७ मध्ये जवळपास दोन एकर क्षेत्रामध्ये शिवरंग ॲग्रो नावाने सेंद्रिय गूळ निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात ३ मीलमधून ऊस गाळप केल्यानंतर रस उकळून गूळ बनवण्यासाठी ५ स्वतंत्र अत्याधुनिक कढई आहेत. १८ ते २० मजूर याठिकाणी मशिनरी हाताळणी, पॅकिंग, सफाई आदी कामे सांभाळतात. रसायन विरहित गूळ निर्मितीसाठी केवळ भेंडी पावडर, चुना आदीचा वापर केला जातो.

यामुळे आरोग्यासाठी हितकारक असा नैसर्गिक गूळ याठिकाणी तयार होत असल्याचे दिसते. येथे गुळासोबतच गूळ पावडर, काकवी आदी तयार करण्यात येते. तसेच उसाची चोथरी, धूर, राख, मळी आदी टाकाऊ घटकांचा पुन्हा वापर केला जात आहे. या प्रकल्पाची प्रति दिन जवळपास २०० टन ऊस गाळप क्षमता असून याद्वारे दररोज २० ते २२ टन गूळ उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

सद्या ३ कढईतून गूळनिर्मिती सुरू असून तयार होणारा गूळ मुंबई, पुणे, जळगाव आदी जिल्ह्यात वितरित होत आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाची गरज भासणार आहे. साधारणपणे मासिक ३ हजार टन उसाद्वारे ३०० टन गुळाचे उत्पादन होऊन ७० ते ८० लाखांची उलाढाल अपेक्षित असल्याचे मयूर वैद्य यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी त्यांना वडील रंगनाथ वैद्य, नितीन तुपे आदींचे सहकार्य लाभले.

----------

मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांकडून सहज नेला जातो. परंतु, अल्पभूधारक ऊस उत्पादकांची अडचण होते. परिसरातील अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करू शकलो याचा अभिमान वाटतो.

-मयूर रंगनाथ वैद्य,

अध्यक्ष, शिवरंग उद्योग समूह

फोटो ओळी ०७ बालमटाकळी

बालमटाकळी येथे शिवरंग उद्योग समूहाचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य यांनी उभारलेला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प.