शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारत माता की जय..साईनामाचा गजर करीत बिहारच्या मजुरांची घरवापसी:  साईनगरीतून पाचवी रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:42 IST

कोरोनाच्या धास्तीने रोजी-रोटीकडे पाठ करून हजारो मजूर आपल्या मातीत परतत आहेत. कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील ११०४ मजुरांना घेवून शुक्रवारी (दि.२२ मे) मध्यरात्री साईनगरीतून पाचवी श्रमीक रेल्वे बिहारला रवाना झाली. यावेळी मजुरांनी  भारत माता की जय...वंदेमातरम व साईबाबांच्या नावाचा जयघोष केला.

शिर्डी : कोरोनाच्या धास्तीने रोजी-रोटीकडे पाठ करून हजारो मजूर आपल्या मातीत परतत आहेत. कोपरगाव, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील ११०४ मजुरांना घेवून शुक्रवारी (दि.२२ मे) मध्यरात्री साईनगरीतून पाचवी श्रमीक रेल्वे बिहारला रवाना झाली. यावेळी मजुरांनी  भारत माता की जय...वंदेमातरम व साईबाबांच्या नावाचा जयघोष केला.   या मजुरांचा स्वगृही परतण्यासाठी रेल्वे प्रवासाचा खर्च राज्य सरकारने केला आहे. यासाठी ७ लाख, ७२ हजार ९२० रूपये खर्च आला. घरी परतण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या प्रशासनाला व परतीचे भाडे भरणा-या राज्य शासनाला धन्यवाद देत या मजुरांनी शुक्रवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजता घरची वाट धरली. साईनगरीतून यापूर्वी उत्तरप्रदेशला चार श्रमिक रेल्वेतून ५७३१ मजूर स्वगृही परतले आहेत.    गेल्या सोळा दिवसात पाच रेल्वेद्वारे परराज्यातील ६८३५ मजूर आपआपल्या घरी परतले आहेत. यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, संगमनेर तहसीलदार अमोल निकम, कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, कोपरगावचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, एम़बी़ देसले, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मिना उपस्थीत होते.रेल्वेतील मजुरांना संस्थानच्या वतीने सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी अन्नाची पाकिटे दिली. परिवहन महामंडळाने कामगारांना रेल्वे स्थानकावर पोहोचवण्याची व्यवस्था केली.२०० मजुरांचा घरी परतण्याचा निर्णय रद्दबिहारला स्वगृही परतणा-या मुलांमध्ये राहाता तालुक्यात राहाता व निर्मळ पिंप्री येथे मदरशामध्ये शिक्षण घेत असलेल्या ८६ मुलांचा समावेश आहे. कामे सुरू झाल्याने जवळपास दोनशे मजुरांनी घरी परतण्याचा निर्णय रद्द केला. मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीBiharबिहारLabourकामगार