शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:53 IST

अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन  सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.

 

अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन  सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.कालवा सल्लागार समितीच्या नियोजना प्रमाणे सोमवारी दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात 1 हजार 500 कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.भंडारदरा धरणातून या पूर्वीच निळवंडे धरणात पाणी सोडण्यात येत होते.भंडारदऱ्यातून वीज निर्मितीसाठी 830 कुसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.सोडण्यात येणारे हे पाणी निळवंडे धरणात येत असते. शेतीसाठी सोडण्यात येणारे हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असून या कालावधीत सुमारे 3 हजार ते 3 हजार 400 दशलक्ष घनफुट पाण्याचा वापर होईल असा अंदाज भंडारदराचे शाखा अभियंता देशमुख यांनी व्यक्त केला. पाणी सोडते वेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा 6 हजार 575 दशलक्ष घनफुट इतका होता तर निळवंडेतील पाणीसाठा 4 हजार 374 दशलक्ष घनफुट होता.