शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अफवा पसरवाल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:40 IST

लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे.

अहमदनगर : लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरविणारे व संशय घेऊन कुणाला मारहाण करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोलीस प्रशासन म्हणाले आहे, की गावामध्ये मुले पळविणा-या व दरोडा टाकणा-या टोळ्या आल्या आहेत, अशा स्वरूपाच्या अफवा सोशल मीडिया व इतर प्रकारे पसरवून जनतेमध्ये घबराट व भीतीचे वातावरण पसरविण्यात येत आहे. अशा स्वरूपाच्या अफवांमुळे गावात व वस्तीवर येणारे अपरिचित लोक, साधूवेशातील लोक, किरकोळ विक्री करणारे फेरीवाले यांना विनाकरण मारहाण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या मारहाणीतून कोणी व्यक्ती जखमी व अथवा मृत्युमुखी पडली तर सोशल मीडियावर इतर प्रकारे अफवा पसरविणा-या इसमांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.अशा स्वरूपाच्या अफवांमुळे औरंगाबाद येथे खुनाची घटना घडली असून, या प्रकरणी ५ ते ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्वरूपाच्या घटना नंदुरबार व मध्य प्रदेश येथेही घडल्या आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरवू नयेत व कोणी अशा अफवा पसरवित असेल तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.सोशल मीडियातूनच अफवेचा उगममुले पळविणारी टोळी आल्याची अफवा प्रथम दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश व नंदुरबार भागात प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून आली. परराज्यातील संग्रहित व्हिडिओ प्रसारित करून त्याखाली दंतकथा सुरू झाल्या. ही अफवा औरंगाबाद, लातूर, बीड ते नगर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सोशल मीडियासह या अफवेची माऊथ पब्लिसिटीही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्यावर सहज विश्वास ठेवत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस