शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे- लहू कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 13:14 IST

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नगरमध्येही काँग्रेसच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

यावेळी आमदार कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,'आपला देश हा श्रद्धाळू लोकांचा देश आहे. त्यामुळे मंदिर खुली केली तर गर्दी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या समूह संसर्ग सुरू झाला आहे. अशा काळात मंदिरे खुली करून पुन्हा लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणे योग्य होणार नाही. त्यामुळे श्रद्धाळूनी श्रद्धा घरातल्या घरात व्यक्त करावी, असे माझ्यासारख्याला वाटते. आम्ही देखील श्रद्धाळू आहोत. पण आपल्याला हा निर्णय घेण्यासाठी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. करोनासंसर्ग जेव्हा कमी होईल, हळूहळू रुग्ण संख्या कमी होत जाईल, परिस्थिती आटोक्यात येईल, तेव्हा या सर्व गोष्टी खुल्या होणारच आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, यासाठी भाजपसह विविध पक्ष, संघटना यांच्याकडून मागणी करण्यात येत असून यासाठी भाजपने राज्यभर आंदोलने केली. मात्र, अद्याप धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मंदिर उघडण्याबाबत अद्याप संयम बाळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच या निर्णयाला वेळ लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही तालुके, शहर स्वतःहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय तेथील नागरिक घेऊ लागले आहे. आमदार कानडे प्रतिनिधित्व करीत असलेल्या मतदारसंघातील श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये ही सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. याबाबत कानडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'लोक स्वतःहून बंद करीत असतील तर आम्हाला त्याबाबत काही म्हणायचे नाही. पण बंदची बळजबरी करू नये. कारण मोदी सरकारच्या लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थेचे अगोदरच तीन तेरा वाजले आहेत. जीडीपी हा इतिहासात पहिल्यांदा एवढा खाली आला आहे. त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने घाईघाईने केलेला लॉकडाऊन आहे. आता आपली जबाबदारी ही अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आहे. सरकारने अनलॉक सुरू केले. त्यामुळे हळूहळू हातावर पोट असणारी माणसे पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. पुन्हा लॉकडाऊन केला तर या माणसांच्या अडचणीत भर पडेल. त्यामुळे उद्योग धंदे चालू राहणे गरजेचे आहे. कारण हातावर पोट असणाऱ्या माणसांना जगता आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे बंदबाबत कोणतीही जबरदस्ती करू नये,' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा