शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे- लहू कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 13:14 IST

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नगरमध्येही काँग्रेसच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

यावेळी आमदार कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,'आपला देश हा श्रद्धाळू लोकांचा देश आहे. त्यामुळे मंदिर खुली केली तर गर्दी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या समूह संसर्ग सुरू झाला आहे. अशा काळात मंदिरे खुली करून पुन्हा लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणे योग्य होणार नाही. त्यामुळे श्रद्धाळूनी श्रद्धा घरातल्या घरात व्यक्त करावी, असे माझ्यासारख्याला वाटते. आम्ही देखील श्रद्धाळू आहोत. पण आपल्याला हा निर्णय घेण्यासाठी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. करोनासंसर्ग जेव्हा कमी होईल, हळूहळू रुग्ण संख्या कमी होत जाईल, परिस्थिती आटोक्यात येईल, तेव्हा या सर्व गोष्टी खुल्या होणारच आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, यासाठी भाजपसह विविध पक्ष, संघटना यांच्याकडून मागणी करण्यात येत असून यासाठी भाजपने राज्यभर आंदोलने केली. मात्र, अद्याप धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मंदिर उघडण्याबाबत अद्याप संयम बाळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच या निर्णयाला वेळ लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही तालुके, शहर स्वतःहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय तेथील नागरिक घेऊ लागले आहे. आमदार कानडे प्रतिनिधित्व करीत असलेल्या मतदारसंघातील श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये ही सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. याबाबत कानडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'लोक स्वतःहून बंद करीत असतील तर आम्हाला त्याबाबत काही म्हणायचे नाही. पण बंदची बळजबरी करू नये. कारण मोदी सरकारच्या लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थेचे अगोदरच तीन तेरा वाजले आहेत. जीडीपी हा इतिहासात पहिल्यांदा एवढा खाली आला आहे. त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने घाईघाईने केलेला लॉकडाऊन आहे. आता आपली जबाबदारी ही अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आहे. सरकारने अनलॉक सुरू केले. त्यामुळे हळूहळू हातावर पोट असणारी माणसे पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. पुन्हा लॉकडाऊन केला तर या माणसांच्या अडचणीत भर पडेल. त्यामुळे उद्योग धंदे चालू राहणे गरजेचे आहे. कारण हातावर पोट असणाऱ्या माणसांना जगता आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे बंदबाबत कोणतीही जबरदस्ती करू नये,' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा