शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
2
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
3
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
4
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
5
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
6
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
7
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
8
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
9
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
10
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
11
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
12
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
13
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
14
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
15
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
16
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
18
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
19
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
20
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजार रुपयांचे बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

अहमदनगर : उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार ...

अहमदनगर : उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकामध्ये खाते काढण्यास सांगण्यात आले आहे. परंतु केवळ दीडशे ते अडीचशे रुपयांसाठी एक हजार रुपये खर्चून खाते उघडावे लागणार असल्याने पालकांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना सन २०२१ च्या उन्हाळी सुटीत धान्य वाटप करायचा निर्णय घेण्यात आला असून धान्याच्या प्रत्यक्ष खर्चाएवढी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक योजनांसाठी काही विद्यार्थ्यांचे बँक खाते आहेत. परंतु ती संख्या कमी आहे. सध्या शालेय पोषण आहार करिता धान्यासाठी अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवी करिता १५६ रुपये, तर सहावी ते आठवीसाठी २३४ रुपये मिळणार आहे. त्यामुळे दीडशे ते अडीचशे रुपयांच्या निधीकरिता एक हजार रुपये भरून बँक खाते काढणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही, अशी नाराजी पालकांकडून व्यक्त होत आहे.

-------------------

पहिली ते पाचवी लाभार्थी संख्या - २,७६,१७०

सहावी ते आठवी लाभार्थी संख्या - १,८७,७९१

एकूण - ४,६३,९६१

एकूण शाळा - ४,५४७

-------------------

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६ रुपये

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४ रुपये

--------------

बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

बँकेत खाते उघडण्यासाठी कमाल एक हजार रूपये लागतात. परंतु लहान मुलांचे खाते उघडताना केवायसी व अन्य कारणांमुळे विलंब होतो. यात एटीएम कार्ड व सेवेचा लाभ दिला जातो. मागील वर्षीच अग्रणी बँकेच्या माध्यमातून नवीन खाते उघडण्यासाठी विभागनिहाय बँका ठरवून दिलेल्या आहेत. परंतु १५० ते ३०० रूपयांसाठी एक हजार रूपये आधी जमा करणे अनेक पालकांना अशक्य आहे.

-----------

पालकांची डोकेदुखी वाढली

शालेय पोषण आहाराच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशासाठी बँकेत खाते उघडण्यासाठी शाळांकडून सूचना दिल्या जात आहेत. परंतु सध्या कोरोनामुळे बँकेत गर्दी करणे योग्य नाही. अशात खाते उघडणे जिकिरीचे आहे.

- कुंडलिक चोपडे, अहमदनगर

--------

दीडशे ते दोनशे रूपयांच्या रकमेसाठी बँकेत खाते उघडणे गैरसोयीचे आहे. खाते उघडले की त्यात किमान रक्कम ठेवावी लागते, अन्यथा बँकेकडून दंड केला जातो. यात पालकांचे नुकसान आहे.

- राजेश कर्डिले, अहमदनगर

--------------