शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, मढी ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन, ग्रामसेवकाला पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:42 IST

Kanifnath Yatra : ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

Kanifnath Yatra : तिसगाव (जि. अहिल्यानगर) : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. 

गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच, याबाबत ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मढी येथे शनिवारी (दि.२२) झालेल्या ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर सोमवारी मुस्लीम समाजाचे शन्नो पठाण, चाँद मणियार, फिरोज शेख, उबेद आतार, इसुब शेख, आसीफ शेख, नासीरभाई शेख, नवाब पठाण, परवेझ मणियार यांच्यासह मढीच्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेतली. 

मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत दुकाने लावण्यास बंदी केल्याचा ठराव करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. मढी यात्रा ही सर्व जाती-धर्माच्या लोकांची आहे. ही परंपरा सातशे वर्षांची आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याला बाधा आणलेली आहे. हे कृत्य करणारे जे आहेत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अशी, मागणी केली आहे.

ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य - गटविकास अधिकारीमढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसते. याबाबत चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक व ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब समिती नोंदवील. ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठविला जाईल, असे पाथर्डी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअहिल्यानगर : मढीच्या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याबाबतचा बेकायदेशीर ठराव मढी ग्रामपंचायतने केला. हा ठराव करणारे सरपंच व प्रशासकीय सेवकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. अॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले आहे. मढीची यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून लोक येथे येतात. मात्र, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याचा घटनाबाह्य ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे हा ठराव करणारे सरपंच, ग्रामसेवक व प्रशासकीय सेवकांवर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर