शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, मढी ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन, ग्रामसेवकाला पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:42 IST

Kanifnath Yatra : ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

Kanifnath Yatra : तिसगाव (जि. अहिल्यानगर) : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. 

गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच, याबाबत ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मढी येथे शनिवारी (दि.२२) झालेल्या ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर सोमवारी मुस्लीम समाजाचे शन्नो पठाण, चाँद मणियार, फिरोज शेख, उबेद आतार, इसुब शेख, आसीफ शेख, नासीरभाई शेख, नवाब पठाण, परवेझ मणियार यांच्यासह मढीच्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेतली. 

मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत दुकाने लावण्यास बंदी केल्याचा ठराव करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. मढी यात्रा ही सर्व जाती-धर्माच्या लोकांची आहे. ही परंपरा सातशे वर्षांची आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याला बाधा आणलेली आहे. हे कृत्य करणारे जे आहेत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अशी, मागणी केली आहे.

ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य - गटविकास अधिकारीमढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसते. याबाबत चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक व ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब समिती नोंदवील. ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठविला जाईल, असे पाथर्डी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअहिल्यानगर : मढीच्या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याबाबतचा बेकायदेशीर ठराव मढी ग्रामपंचायतने केला. हा ठराव करणारे सरपंच व प्रशासकीय सेवकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. अॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले आहे. मढीची यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून लोक येथे येतात. मात्र, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याचा घटनाबाह्य ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे हा ठराव करणारे सरपंच, ग्रामसेवक व प्रशासकीय सेवकांवर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर