शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, मढी ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन, ग्रामसेवकाला पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:42 IST

Kanifnath Yatra : ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

Kanifnath Yatra : तिसगाव (जि. अहिल्यानगर) : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. 

गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच, याबाबत ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मढी येथे शनिवारी (दि.२२) झालेल्या ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथांच्या यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर सोमवारी मुस्लीम समाजाचे शन्नो पठाण, चाँद मणियार, फिरोज शेख, उबेद आतार, इसुब शेख, आसीफ शेख, नासीरभाई शेख, नवाब पठाण, परवेझ मणियार यांच्यासह मढीच्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेतली. 

मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना यात्रेत दुकाने लावण्यास बंदी केल्याचा ठराव करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. मढी यात्रा ही सर्व जाती-धर्माच्या लोकांची आहे. ही परंपरा सातशे वर्षांची आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याला बाधा आणलेली आहे. हे कृत्य करणारे जे आहेत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अशी, मागणी केली आहे.

ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य - गटविकास अधिकारीमढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसते. याबाबत चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक व ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब समिती नोंदवील. ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठविला जाईल, असे पाथर्डी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअहिल्यानगर : मढीच्या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याबाबतचा बेकायदेशीर ठराव मढी ग्रामपंचायतने केला. हा ठराव करणारे सरपंच व प्रशासकीय सेवकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. अॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले आहे. मढीची यात्रा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून लोक येथे येतात. मात्र, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी या यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करण्याचा घटनाबाह्य ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे हा ठराव करणारे सरपंच, ग्रामसेवक व प्रशासकीय सेवकांवर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर