शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बबनराव पाचपुतेंकडून बनवाबनवीचा कळस

By admin | Updated: September 19, 2014 23:39 IST

श्रीगोंदा : पाचपुतेंच्या कारखान्याने ठिबक सिंचन २० कोटींचे कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते थकविले आहे.

श्रीगोंदा : तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्याने सुमारे ७ हजार शेतकऱ्यांच्या नावावर ठिबक सिंचन २० कोटींचे कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते थकविले आहे. भविष्यात कर्जापायी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण? असा सवाल कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.जगताप पुढे म्हणाले, पाचपुतेंनी शरद पवारांच्या स्वप्नातील हिरडगावच्या माळरानावर इंटीग्रेटेड शुगर प्रकल्प उभा केला. ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाचे बिल वर्ग करणेपर्यंत प्रसिद्धीचा गाजावाजा करताना बनवाबनवीचा कळस केला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर दिली नाही. काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली. कामगारांना वेतन नाही. शिवाय ऊस वाहतुकदारांचे कमिशन दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी, ऊस वाहतूकदार कामगार यांच्यावर मोठा अन्याय झाला मात्र पाचपुतेंकडे सत्ता सामर्थ्य असल्याने तक्रारी करून देखील संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. आपल्यावर कुकडी साखर कारखान्याची कमी वयात जबाबदारी पडली. संचालक मंडळास विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देताना कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले आणि दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी मदत, रस्ते बंधाऱ्याची कामे कुकडी कारखान्याच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत याचे मनात समाधान आहे. (तालुका प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मैदानात कितीही उमेदवार उतरले तरी तरुण मित्रांच्या पाठबळावर लढाई जिंकणार, असा विश्वास जगताप यांनी शेवटी व्यक्त केला.