शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

बदमाश राष्ट्रवादीकडून बुद्धीभेद : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:40 IST

कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत ...

कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत आहे. पण, निळवंडे धरणाचे पाणी कोपरगावला मिळणार असल्याने बदमाश राष्ट्रवादीवाले उगाचच जनतेला भडकावून बुध्दीभेद करीत आहेत, अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गुरूवारी रात्री पालिकेतील भाजप-सेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची शिवतारे यांच्याशी शिर्डी विश्रामगृहावर भेट घेऊन शहराला निळवंडेतुन पिण्याच्या पाण्याची योजनेसंदर्भात चर्चा घडवून आणली. यावेळी शिवतारे म्हणाले, २००३ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व धरणांवर सम प्रमाणात पाण्याचे आरक्षण टाकण्याचा निर्णय झाला. पण, शासन निर्णय काढला गेला नाही.आपण मोठे उद्योग आणून एम.आय.डी.सी. करण्याची सूचना केली होती. थेट एम.आय.डी.सी. द्यायला मी काही उद्योगमंत्री नाही. रोजगाराची गरज असल्यास तुम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून द्या, मी मंजुरी आणून देतो, असे म्हटल्याचा विपर्यास झाल्याचे सांगत शिवतारे यांनी शिवसेना नेत्यांनाच घरचा आहेर दिला. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, उनगराध्यक्ष विजय वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, सत्येन मुंदडा आदी उपस्थित होते.

योजना व्यासपीठावर होत नसतातसांगलीचे पाणी लातुरला, उजनीचे पाणी उस्मानाबादला देता येते. मग, निळवंडेचे पाणी कोपरगावला का नाही? शिर्डी संस्थानने दिलेल्या ५०० कोटीच्या निधीतुन निळवंडेहून शिर्डीपर्यंत पाईपलाइनची पहिली योजना होती. तेथून पुढे कोपरगावला पिण्याच्या पाण्यासाठी आपण मंजुरी दिली. या कामासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे चालता येत नसूनही दोनदा माझ्याकडे आले. त्यांचे आभार सर्वांनी मानले पाहिजे. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. पण, कुणीतरी चुकीच्या माहितीवर अजित पवार यांनी पाईपलाइनला एका कार्यक्रमात व्यासपीठावर मंजुरी दिल्याचे पत्रकारांना चुकीचे सांगितले. योजना व्यासपीठावर होत नसतात, त्यांना विधानसभेत मंजुरी घ्यावी लागते.-विजय शिवतारे, राज्यमंत्री