शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बदमाश राष्ट्रवादीकडून बुद्धीभेद : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:40 IST

कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत ...

कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत आहे. पण, निळवंडे धरणाचे पाणी कोपरगावला मिळणार असल्याने बदमाश राष्ट्रवादीवाले उगाचच जनतेला भडकावून बुध्दीभेद करीत आहेत, अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गुरूवारी रात्री पालिकेतील भाजप-सेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची शिवतारे यांच्याशी शिर्डी विश्रामगृहावर भेट घेऊन शहराला निळवंडेतुन पिण्याच्या पाण्याची योजनेसंदर्भात चर्चा घडवून आणली. यावेळी शिवतारे म्हणाले, २००३ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व धरणांवर सम प्रमाणात पाण्याचे आरक्षण टाकण्याचा निर्णय झाला. पण, शासन निर्णय काढला गेला नाही.आपण मोठे उद्योग आणून एम.आय.डी.सी. करण्याची सूचना केली होती. थेट एम.आय.डी.सी. द्यायला मी काही उद्योगमंत्री नाही. रोजगाराची गरज असल्यास तुम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून द्या, मी मंजुरी आणून देतो, असे म्हटल्याचा विपर्यास झाल्याचे सांगत शिवतारे यांनी शिवसेना नेत्यांनाच घरचा आहेर दिला. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, उनगराध्यक्ष विजय वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, सत्येन मुंदडा आदी उपस्थित होते.

योजना व्यासपीठावर होत नसतातसांगलीचे पाणी लातुरला, उजनीचे पाणी उस्मानाबादला देता येते. मग, निळवंडेचे पाणी कोपरगावला का नाही? शिर्डी संस्थानने दिलेल्या ५०० कोटीच्या निधीतुन निळवंडेहून शिर्डीपर्यंत पाईपलाइनची पहिली योजना होती. तेथून पुढे कोपरगावला पिण्याच्या पाण्यासाठी आपण मंजुरी दिली. या कामासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे चालता येत नसूनही दोनदा माझ्याकडे आले. त्यांचे आभार सर्वांनी मानले पाहिजे. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. पण, कुणीतरी चुकीच्या माहितीवर अजित पवार यांनी पाईपलाइनला एका कार्यक्रमात व्यासपीठावर मंजुरी दिल्याचे पत्रकारांना चुकीचे सांगितले. योजना व्यासपीठावर होत नसतात, त्यांना विधानसभेत मंजुरी घ्यावी लागते.-विजय शिवतारे, राज्यमंत्री