शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

बदमाश राष्ट्रवादीकडून बुद्धीभेद : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:40 IST

कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत ...

कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत आहे. पण, निळवंडे धरणाचे पाणी कोपरगावला मिळणार असल्याने बदमाश राष्ट्रवादीवाले उगाचच जनतेला भडकावून बुध्दीभेद करीत आहेत, अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गुरूवारी रात्री पालिकेतील भाजप-सेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची शिवतारे यांच्याशी शिर्डी विश्रामगृहावर भेट घेऊन शहराला निळवंडेतुन पिण्याच्या पाण्याची योजनेसंदर्भात चर्चा घडवून आणली. यावेळी शिवतारे म्हणाले, २००३ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व धरणांवर सम प्रमाणात पाण्याचे आरक्षण टाकण्याचा निर्णय झाला. पण, शासन निर्णय काढला गेला नाही.आपण मोठे उद्योग आणून एम.आय.डी.सी. करण्याची सूचना केली होती. थेट एम.आय.डी.सी. द्यायला मी काही उद्योगमंत्री नाही. रोजगाराची गरज असल्यास तुम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून द्या, मी मंजुरी आणून देतो, असे म्हटल्याचा विपर्यास झाल्याचे सांगत शिवतारे यांनी शिवसेना नेत्यांनाच घरचा आहेर दिला. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, उनगराध्यक्ष विजय वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, सत्येन मुंदडा आदी उपस्थित होते.

योजना व्यासपीठावर होत नसतातसांगलीचे पाणी लातुरला, उजनीचे पाणी उस्मानाबादला देता येते. मग, निळवंडेचे पाणी कोपरगावला का नाही? शिर्डी संस्थानने दिलेल्या ५०० कोटीच्या निधीतुन निळवंडेहून शिर्डीपर्यंत पाईपलाइनची पहिली योजना होती. तेथून पुढे कोपरगावला पिण्याच्या पाण्यासाठी आपण मंजुरी दिली. या कामासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे चालता येत नसूनही दोनदा माझ्याकडे आले. त्यांचे आभार सर्वांनी मानले पाहिजे. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. पण, कुणीतरी चुकीच्या माहितीवर अजित पवार यांनी पाईपलाइनला एका कार्यक्रमात व्यासपीठावर मंजुरी दिल्याचे पत्रकारांना चुकीचे सांगितले. योजना व्यासपीठावर होत नसतात, त्यांना विधानसभेत मंजुरी घ्यावी लागते.-विजय शिवतारे, राज्यमंत्री