शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:14 IST

अहमदनगर शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.

अहमदनगर :  शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महापौर बाबासाहेब वाकळे  मात्र भागातून बाहेर पडायला तयार नाहीत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्थापन केलेल्या सुरक्षा समितीचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे वाकळे हे प्रभागाचे महापौर आहेत की शहराचे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.शहरावरील कोरोनाचे  संकट गडद झाले आहे. एकापाठोपाठ एक रुग्ण सापडत आहेत. महापालिकेकडून उपाययोजनाही सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर बाबासाहेब वाकळे हे प्रभाग क्रमांक सहाचे नेतृत्व करतात. त्यांनी गुरुवारी त्यांच्या प्रभागातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. ही बैठक त्यांनी सोशल डिस्टन्स पाळून घेतली. इतर प्रभागांतील समित्यांचे काय सुरू आहे ? याचा मात्र महापौरांना अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. वाकळे हे आपल्याच  प्रभागातील कामे मार्गी लावण्यात व्यस्त असतात, अशी त्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. इतर प्रभागात मात्र ते फारसे लक्ष देत नाहीत. त्यात कोरोनाच्या संकट काळातही ते आपल्याच प्रभागात तळ ठोकून आहेत. म्हणूनच वाकळे हे   शहराचे महापौर आहेत की त्यांच्या प्रभागाचे असा प्रश्न निर्माण होतो.सिद्धीबागेसमोरील गटारीचा प्रश्न, वादळी पावसात शहरात अनेक ठिकाणी झालेले नुकसान, बाहेरून शहरात लोक येत आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून शहरातील लोकांना भिती निर्माण झाली आहे. प्रभागातील लोकांना त्यांनी अन्नधान्य वाटप केले? पण शहरातील नागरिकांना काही अडचणी तर नाहीत ना? याकडे पहायला मात्र महापौरांना वेळ मिळेनासा झाला आहे. महापालिकेला कल्पक व कृतीशील आयुक्त लाभले आहेत. मात्र त्यांच्यासोबत बसून शहरातील सर्व ठाकठीक करण्यासाठीही त्यांना वेळ मिळेना असे दिसते आहे. शहरात भाजीपाला विक्रीला अद्यापही शिस्त आलेली नाही.  याबाबत चौकोन आखायलाही महापालिकेला वेळ मिळाला नाही की महापौरांना लक्ष घालायला वेळ मिळाला नाही.  चितळे रोड, डाळ मंडईत रोजच फिजिकल डिस्टन्सिगचा फज्जा उडतो. मात्र तिथे महापालिकेचे कोणतेही पथक अत्तापर्यंत गेलेले दिसून आले नाही.   अशा कितीतरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. मात्र त्याला उत्तर कोण देणार? हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर