शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेततळ्यात बुडून बाप-लेकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST

अकोले : शेततळ्यात पडलेल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा मुलीसह मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील वीरगाव येथे सोमवारी दुपारी दोन ...

अकोले : शेततळ्यात पडलेल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा मुलीसह मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील वीरगाव येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

वीरगाव येथे दुपारी दोन वाजता अश्विनी कृष्णांगर थोरात (वय १६) ही दहावीची विद्यार्थिनी अभ्यासासाठी शेततळ्याच्या काठावर बसली होती. पाय घसरून ती शेततळ्यात पडली. तिचा आवाज ऐकून तिचे वडील कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय ४५) यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. कृष्णांगर यांना फारसे पोहता येत नसतानाही त्यांनी मुलीला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. ते मुलीला वाचवू शकले नाहीत आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

काही वेळाने घरातील लोकांनी गावकरी व वाटसरू यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले. वीरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.