शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी सरकारने शेतकºयांना अुनदान द्यावे, राधाकृष्ण विखे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:20 IST

लोणी : कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडून शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी  जिल्‍ह्यांच्‍या  सीमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने तात्‍काळ निर्णय करावेत ,अशा महत्‍वपुर्ण मागण्‍या माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केल्‍या आहेत.

लोणी : कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडून शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी  जिल्‍ह्यांच्‍या  सीमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने तात्‍काळ निर्णय करावेत ,अशा महत्‍वपुर्ण मागण्‍या माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केल्‍या आहेत.याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विखे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्‍या आपत्तीनंतर राज्‍यातील कृषि क्षेत्रापुढे निर्माण झालेल्‍या  अडचणी आणि यावर उपाययोजनांबाबत सरकारने तातडीने निर्णय करावेत्कृषि व पणन विभागाच्‍या नियोजन शुन्‍य कारभाराचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. सरकारच्‍या उदासीनतेमुळेच राज्‍यातील शेतकरी उध्‍वस्‍त झाला आहे.    लाखांचा पोशिंदा म्‍हणून शेतक-यांना या संकटाच्‍या काळात राज्‍य सरकारने दिलासा देण्‍याची गरज आहे. मात्र शासनाच्‍या अनुदानावर ज्‍या व्‍यवस्‍था पोसल्‍या जात आहेत, त्‍यांनीच शेतक-यांकडे पाठ फिरवली आहे. कृषि व पणन विभागाने समन्‍वय करुन या संकटाच्‍या काळात शेतकरी ते ग्राहक ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्‍याची गरज होती. पण ते होवू न शकल्‍यामुळे शेतक-यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहचू शकला नाही. राज्‍यात कोल्‍ड  स्‍टोअरेज,पॅकींग, ग्रेडींग व प्रक्रीयेच्‍या अपु-या व्‍यवस्‍थेमुळे शेतक-यांना आपला माल शेतातच नांगरणी करुन मातीमोल करावा लागला. अत्‍यावश्‍यक सेवेच्‍या नावाखाली जर इतर दुकानांना सरकार आता परवानगी देतच असेल तर शेतक-यांनाही शहरांमधील मैदाने व मोकळ्या जागा भाजी आणि फळ विक्रीसाठी उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी आ. विखे पाटील यांनी केली आहे. कृषि विभागाचे योग्‍य मार्गदर्शन शेतक-यांना मिळत नसल्‍यामुळे शहरांमध्‍ये कृषि माल घेवून जाणा-या शेतक-यांना पोलिसी आत्‍याचार सहन करावे लागतात व शेतमालाची नासाडी होवून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे.परप्रांतीय कामगारांबरोबरच ऊस तोडणी मजुरांचा प्रश्‍नही शासनाने गांभियार्ने घ्‍यावा. दुध उत्‍पादक शेतक-यांची होणारी लुट थांबवावी आणि कुकुट पालन व्‍यवसायीकांनाही राज्‍य सरकारने तातडीने विशेष पॅकेज जाहीर करण्‍याबरोबरच केंद्र सरकारने लॉकडाऊनच्‍या काळात दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांची राज्‍य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणीही आ.विखे पाटील यांनी आपल्‍या पत्रात केली आहे.