शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी सरकारने शेतकºयांना अुनदान द्यावे, राधाकृष्ण विखे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 14:20 IST

लोणी : कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडून शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी  जिल्‍ह्यांच्‍या  सीमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने तात्‍काळ निर्णय करावेत ,अशा महत्‍वपुर्ण मागण्‍या माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केल्‍या आहेत.

लोणी : कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडून शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी  जिल्‍ह्यांच्‍या  सीमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने तात्‍काळ निर्णय करावेत ,अशा महत्‍वपुर्ण मागण्‍या माजी मंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केल्‍या आहेत.याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विखे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्‍या आपत्तीनंतर राज्‍यातील कृषि क्षेत्रापुढे निर्माण झालेल्‍या  अडचणी आणि यावर उपाययोजनांबाबत सरकारने तातडीने निर्णय करावेत्कृषि व पणन विभागाच्‍या नियोजन शुन्‍य कारभाराचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. सरकारच्‍या उदासीनतेमुळेच राज्‍यातील शेतकरी उध्‍वस्‍त झाला आहे.    लाखांचा पोशिंदा म्‍हणून शेतक-यांना या संकटाच्‍या काळात राज्‍य सरकारने दिलासा देण्‍याची गरज आहे. मात्र शासनाच्‍या अनुदानावर ज्‍या व्‍यवस्‍था पोसल्‍या जात आहेत, त्‍यांनीच शेतक-यांकडे पाठ फिरवली आहे. कृषि व पणन विभागाने समन्‍वय करुन या संकटाच्‍या काळात शेतकरी ते ग्राहक ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्‍याची गरज होती. पण ते होवू न शकल्‍यामुळे शेतक-यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहचू शकला नाही. राज्‍यात कोल्‍ड  स्‍टोअरेज,पॅकींग, ग्रेडींग व प्रक्रीयेच्‍या अपु-या व्‍यवस्‍थेमुळे शेतक-यांना आपला माल शेतातच नांगरणी करुन मातीमोल करावा लागला. अत्‍यावश्‍यक सेवेच्‍या नावाखाली जर इतर दुकानांना सरकार आता परवानगी देतच असेल तर शेतक-यांनाही शहरांमधील मैदाने व मोकळ्या जागा भाजी आणि फळ विक्रीसाठी उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी आ. विखे पाटील यांनी केली आहे. कृषि विभागाचे योग्‍य मार्गदर्शन शेतक-यांना मिळत नसल्‍यामुळे शहरांमध्‍ये कृषि माल घेवून जाणा-या शेतक-यांना पोलिसी आत्‍याचार सहन करावे लागतात व शेतमालाची नासाडी होवून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे.परप्रांतीय कामगारांबरोबरच ऊस तोडणी मजुरांचा प्रश्‍नही शासनाने गांभियार्ने घ्‍यावा. दुध उत्‍पादक शेतक-यांची होणारी लुट थांबवावी आणि कुकुट पालन व्‍यवसायीकांनाही राज्‍य सरकारने तातडीने विशेष पॅकेज जाहीर करण्‍याबरोबरच केंद्र सरकारने लॉकडाऊनच्‍या काळात दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांची राज्‍य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणीही आ.विखे पाटील यांनी आपल्‍या पत्रात केली आहे.